Manoj Jarange Mumbai Morcha LIVE : आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारंचं फिरणं मुश्किल होईल, जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने माराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे जरांगे यांनी आझाद मैदानावरील 5000 लोकांच्या मर्यादेचा नियम मोडला असल्याचा आरोप करत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Mumbai Morcha LIVE Updates in Marathi: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या प्रमुख मागणीचा ध्यास धरत सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मराठी समाजाच्या आरक्षणासाठी ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं आहे. कोर्टाने जरांगे यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती, मात्र पोलिसांनी काही अटी घालून त्यांनी फक्त एक दिवस आंदोलनाची परवानगी दिली. पण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करणारच असे म्हणत मनोज जरांगे पाटील हे मात्र आंदोलनावर ठाम असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे संपूर्ण आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारचं त्यावर काय उत्तर असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाबद्दलचे सर्व अपडेट्स वेळोवेळी आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून देत राहणार आहोत, दिवसभर फॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारंचं फिरणं मुश्किल होईल, जरांगे पाटील यांचा इशारा
आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारंचं फिरणं मुश्किल होईल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे.
-
सरकारकडून वेळकाढूपणा सुरु आहे, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन निशाणा साधला आहे. “सरकारकडून वेळकाढूपणा सुरु आहे. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
-
-
मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांना आवाहन, काय म्हणाले?
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधवांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे. कायम सर्वांनी शांतता ठेवा, असं जरांगे पाटील आंदोलकांना उद्देशून म्हणाले.
-
आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची डॉक्टरांकडून चौकशी
आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यात नेतृत्वात मराठा आंदोलकांकडून हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाचा आजचा (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी केली जात आहे.
-
कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही – CM फडणवीस
मराठा आरक्षण आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जरांगे पाटल्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आडमुठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही, चर्चेतून निर्णय होतो. कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल. कोर्टाच्या निर्णयांचा अवमान करुन चालणार नाही. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
-
-
अधिवेशन बोलवून निर्णय घ्या – सुप्रिया सुळे
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अधिवेशन बोलवून निर्णय घ्या, याबाबतचे बिल पास करा आणि आरक्षण देऊन टाका. आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, मात्र ते आमच्यावर टीका करत आहेत. आज त्याच्याकडे 250 आमदार आहेत, ते चुटकीसरशी निर्णय घेऊ शकतात. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना बहुमत दिले आहे, त्यांनी आता निर्णय घ्यावा.
-
मराठा आंदोलकांना सुप्रिया सुळेंना घेरलं
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. तसेच एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.
-
मुंबईत मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकाचा मृतदेह लातूरला पाठवला
आझाद मैदानात आंदोलनासाठी गेलेल्या विजय घोगरे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता आज त्याचा मृतदेह लातूर जिल्ह्यातल्या टाकळगावकडे पाठविण्यात आला आहे,
अहमदपूर इथ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सध्या विजय घोगरे यांचा मृतदेह अँब्युलन्स मध्ये ठेवण्यात आला आहे.
-
खेडूमधून लाखो लोकांचा शिधा घेऊन गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या
पुणे – खेड तालुक्यातून पाच कंटेनर आणि सात पिकअप गाड्याभरून लाखो लोकांचा शिधा घेऊन मुंबईच्या दिशेने मराठा बांधव निघाले आहेत.
-
मराठा आंदोलनकर्त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी पुण्यातील मुस्लिम बांधव एकत्र
पुण्यातील कोंढवा परिसरातील मुस्लिम बांधव मराठा आंदोलनास पाठिंबा देत आहेत. आंदोलनकाच्या सेवेसाठी मुस्लिम बांधव अन्नधान्य घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास मुस्लिम बांधवांचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
-
कल्याण डोंबिवलीमध्ये ओबीसी समाज आक्रमक
जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणावर आक्षेप घेत ओबीसी समाज बांधवांची कल्याण डोंबिवलीत महत्त्वाची बैठक पार पडली. आमचे आरक्षण हिसकावून देणार नाही. वेळ पडल्यास ५५ टक्के समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य- घटनातज्ञ उल्हास बापट
मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन सामोपचाराने तोडगा काढण्याची गरज आहे. शरद पवार यांनी सुचवलेला पर्याय चुकीचा आहे, ती राजकीय भूमिका मांडत आहेत. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येणार नाही. घटनादुरुस्ती करून 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण दिल्यास ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊ शकते. राज्य सरकारने आता जर कुठला कायदा केला तर घटनात्मक तो टिकणार नाही. मराठा समाजात सरसकट मागासले पण नाही असे घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले.
-
छत्रपती संभाजी नगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शेकडो समाज बांधवांना घेऊन उपोषणाला बसलेले आहेत.एकीकडे मराठा आंदोलक जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली. शहराच्या विविध भागात ही बॅनरबाजी करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि कार्य अशा आशयाचे हे बॅनर लागले आहेत.
-
फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकाऱ्यांचे बॅनर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात भाजप पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावले आहेत. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपाची बॅनरबाजी दिसून आली. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा बॅनरवर उल्लेख आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर उल्लेख आहे
-
जरांगेंची राजकारण्यांवर टीका
राजकारणी लोकं नासके असतात. आमदार मंत्री नासके असतात. समजून सांगितलं पाहिजे आरक्षण कसं द्यायचं. मग दोन वर्ष तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला म्हशी भादरायला ठेवलं का. तुम्हाला आंतरवालीत सांगितलं ना. दोन वर्षापासून सर्वाना सांगितलं. हे लोकं ना नीच आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
-
पुण्यात तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
तृतीय पंथीयांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची मनोभावे पूजा अर्चना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आजच्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना देण्यात आला.
-
हर्षवर्धन सपकाळ यांची एकनाथ शिंदेंवर टीका
मुख्यमंत्री असताना दरेगावल जाणे, ही चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिलेले आहे. जेव्हा कुणी काही ऐकत नाही किंवा पळ काढायचा तेव्हा त्याचे शेतीतील फोटो व्हायरल होतात. मात्र मागच्या वेळी आंदोलकांना आपण काय आश्वासन दिले होते. ते त्यांनी स्पष्ट करावे, आम्हालाही आठवण करून द्यावीशी वाटते.आपण छत्रपतींची शपथ घेऊन सांगितले होते की आपण मराठ्यांना आरक्षण देऊ, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
-
मराठा आरक्षण – नो कमेंट
मला याच्यावर काही कॉमेंट करायची नाही. मला याच्यावर काही भाष्य करायचं नाही.जाऊ द्या…म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी मराठा आरक्षण बाबत बोलने टाळलं.
-
चंद्रकांतदादांना म्हणा मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका- मनोज जरांगे
“चंद्रकांतदादांना म्हणा मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. इथून पुढे बोलू नका. या चंद्रकांत पाटलांनीच मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून व्हॅलिडिटी रोखली होती. त्यामुळे वचवच करू नका. तू जास्त लांब नाही. कोल्हापूरलाच आहे. राजघराण्याच्या भागातच आहे. चंद्रकांत पाटील लैच लांब जायला लागलेत,” अशी टीका मनोज जरांगेंनी केली.
-
मराठा आरक्षण उप समितीच्या बैठकीला सुरुवात.
अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री गिरीश महाजन, मंत्री मकरंद पाटील तर इतर सदस्य ऑनलाईन बैठकीत सहभागी…. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचे सदस्य देखील उपस्थित…
-
हे लय भंगार आहेत, नुसत्या बैठका घेत आहेत- मनोज जरांगे
“काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही. हे लय भंगार आहेत. नुसत्या बैठका घेत आहेत. लय झाल्या बैठका,” असं मनोज जरांगे म्हणाले.
-
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऍडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऍडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला… मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलनाचा तिसरा दिवस… आझाद मैदानातील आंदोलनास परवागनी न देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती…. पोलीस गाडीसह अनेक कर्मचारी टॉवरखाली थांबले आहेत…
-
कल्याण पश्चिम परिसरातील निक्की नगर परिसरात भरधाव कारची डिव्हायडरला धडक
कल्याण पश्चिम परिसरातील निक्की नगर परिसरात भरधाव कारची डिव्हायडरला धडक… गाडी पलटली, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही… कार मधील व्यक्ती किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती… कार उलटल्यानंतर रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी मिळून उलटलेली कार सरळ करत सोडवली वाहतूक कोंडी… सध्या खडकपाडा पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल…
-
मराठा आरक्षण उपसमितीची पुन्हा बैठक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी 11 वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची पुन्हा बैठक होणार आहे. काल रात्री उशिरा न्यायमूर्ती शिंदे आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या सचिवांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेचा सारांश विखे पाटील यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर विखे पाटील यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
-
मराठा आंदोलकांसाठी धावून आले धाराशिवकर, पाठवल्या घरगुती भाकरी-चटण्या
मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधून अन्नसामग्री आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली आहे. आंदोलकांचे हाल होऊ नयेत यासाठी, कळंबमधील नागरिकांनी ‘एक घर दोन भाकरी’ या सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत, घरोघरी थापलेल्या भाकरी, कांदा-चटणी, बिस्किटे आणि औषधे गोळा केली. ही सर्व सामग्री घेऊन तीन मालवाहू वाहने मुंबईकडे रवाना झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी या उद्देशाने ही मदत पुरवण्यात आली आहे.
-
मराठा आंदोलकांचा मुंबईच्या दिशेने सुरु असलेला प्रवास पोलिसांनी रोखला, खाण्याच्या वस्तू पोहोचवण्यास अडथळे
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलकांचा मुंबईच्या दिशेने सुरू असलेला प्रवास पोलिसांनी रोखला आहे. मुंबईत प्रवेशाला परवानगी नसल्यामुळे ठाण्यातील आनंद नगर टोल नाक्याजवळ पोलिसांनी आंदोलकांना थांबवले आहे. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे आंदोलकांमध्ये आक्रमकता दिसून येत आहे. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांना पाणी आणि खाण्याच्या वस्तू पोहोचवण्यासही अडथळे येत आहेत.
-
मराठा आंदोलक ठाम; मिळेल त्या ठिकाणी चहा, नाश्ता करून पुन्हा आझाद मैदानाकडे रवाना
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अनेक आंदोलक शहरात मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने लावून चहा-नाश्ता तयार करत आहेत. स्वतःची सोय केल्यानंतर हे सर्व मराठा बांधव पुन्हा एकदा आझाद मैदानाच्या दिशेने जात आहेत. आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने शहरात विविध ठिकाणी आंदोलक एकत्र येताना दिसत आहेत.
-
मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस, आंदोलकांकडून टँकरखाली अंघोळी
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आझाद मैदानाच्या परिसरात मुक्काम केलेल्या आंदोलकांनी आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आलेल्या टँकरच्या खाली बसून रस्त्यावरच आंघोळी केल्या. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे, स्वच्छतागृहे आणि पाण्याची सोय अपुरी पडत असल्याने आंदोलकांना अशाप्रकारे व्यवस्था करावी लागली.
-
शांततेने आंदोलन करा, मौल्यवान वस्तू आणू नका, मराठा आंदोलकांसाठी रेल्वे संघटनेकडून सूचना
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा रेल्वे सेवक संघटनेने मराठा आंदोलकांसाठी आचारसंहितेचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर आंदोलनादरम्यान पाळायच्या १३ ते १४ सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये आंदोलकांनी शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती फोटो किंवा सेल्फीसाठी अनावश्यक गर्दी करू नये, अशा प्रमुख सूचनांचा समावेश आहे. या सूचनांचा उद्देश आंदोलन शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावे हा आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही परवानगी
मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी तिसर्या दिवशीही (31 ऑगस्ट) परवानगी दिली आहे.
-
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा अमित शहा-एकनाथ शिंदेंवर निशाणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी विलेपार्ले राजाला भेट दिली. यावेळेस त्यांनी दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केला.
“एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले आहे आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत येतात हे किती दुःखद आहे. मनोज जरांगे पाटील यांना वारंवार आश्वासने दिली जात आहेत, पण ती पूर्ण केली जात नाहीत. यावरून सरकार खोट्याच्या पायावर उभं असल्याचं दिसून येतं. मोठे नेते मुंबईत येऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा राग त्यांना सहन करावा लागेल”, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
-
हिंगोलीत रविवारी सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
सकल मराठा समाजाकडून हिंगोलीत रविवारी रास्ता रोको करण्यात येणार आहे. नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर घोळवा शिवारात मराठा समाजाच्या बांधवांकडून रास्ता रोको करण्या येणार आहे. मुंबईत मराठा बांधवांची गैरसोय होत असल्याने सरकारच्या निषेधार्थ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत असे एकूण 3 तास रस्ता रोको आंदोलन होणार आहे.
-
पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना आरक्षणाचा निर्णय घ्यायला का नाही सांगितला? – देसाई
तामिळनाडूमध्ये 72% पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे हे विधान शरद पवार यांनी केलं होतं यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 ते 2022 साली महाराष्ट्रात होते. त्यावेळी पवार साहेबांनी त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला? असं देसाई यांनी म्हटलं आहे.
-
आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत भीती वाटत आहे – हाके
ओबीसी आरक्षणाबाबत बोलतामा लक्ष्मण हाके म्हाले की, महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असे सांगितले आहे. सर्वपक्षीय आमदार खासदार उघडपणे भूमिका घेत आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत भीती वाटत आहे असुरक्षिततेची भावना आहे.
-
ही तर मोगलशाही झाली, मराठा आंदोलकांबाबत बच्चू कडू यांचे विधान
मराठा आंदोलकांना त्रास दिला जास असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आंदोलन कुठलंही असो पण आंदोलकांना दुश्मन समजू नये, आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतात. पण तुम्ही तिथे हॉटेल बंद करून टाकली चहापाण्याची व्यवस्था बंद करून टाकली ही तर मोगलशाही झाली. हे व्यवस्थितपणे हाताळले गेले पाहिजे, ते कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी ते दाखवलं पाहिजे.
-
सरकारने मराठ्यांची व्यवस्था करायला हवी – अंबादास दानवे
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. सरकारला आणि मंत्री समितीला अधिकार आहेत. सरकार आणि महापालिका मोर्चाकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने मराठ्यांची व्यवस्था करायला हवी. मुंबईकरांनी मदत करायला पाहिजे.
-
गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल
मुंबई- गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल,
जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केल्याची माहिती
-
राधाकृष्ण विखे पाटील घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
राधाकृष्ण विखे पाटील घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
विखे पाटील मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष
शिंदे समितीसोबत झालेल्या चर्चेचा वृत्तांत विखे पाटील फडणवीसांना सांगणार
-
मराठा आंदोलकांकडून जहांगीर आर्ट गॅलरीत जोरदार घोषणाबाजी
मराठा आंदोलकांकडून जहांगीर आर्ट गॅलरीत जोरदार घोषणाबाजी
दर्शनी भागातील जागेत जात मांडला ठिय्या
-
जालन्यात ओबीसी बांधवांचे सुरू होणार साखळी उपोषण
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देण्यास विरोध दर्शवण्यासाठी आता ओबीसी संघटनांनी आरक्षण बचावाचा नारा दिला आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडल्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात देखील ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 तारखेपासून अंतरवाली सराठीमध्येच ओबीसी बांधव साखळी उपोषणाला बसणार असून या संदर्भात ओबीसी बांधवांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलय.
-
मनोज जरांगे यांनी शिंदे समितीला सुनावले
खरं तर सरकार येणं अपेक्षित होतं. शिंदे समिती येणं अपेक्षित नव्हतं. शिंदे समितीला विनाकारण पुढे घालत आहे. आम्ही सांगितलं की सातारा गॅझिटिअरचा सर्व मराठा कुणबी आहे. हैद्राबादच्या गॅझिटेरिअरचा मराठाही कुणबी आहे. त्याची अंमलबजावणी हवी. एक घंटा वेळ देणार नाही. सगे सोयऱ्यांच्याबाबतही तडजोड नाही. मराठा आणि कुणबी एक आहे. ५८ लाख नोंदीचा आधार आहे. जीआर काढा असे मनोज जरांगे म्हणाले.
-
या आंदोलनाला सामाजिक पार्श्वभूमी आहे- हर्षवर्धन सपकाळे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनाला सामाजिक पार्श्वभूमी आहे. सागर बंगल्यावरून एक द्वेष निर्माण झाला ओबीसी मराठा. या विचाराला तिलांजली दिली पाहिजे सरकारनी राजधर्म पाळावा. माणसाने माणसासारखं वागाव आंदोलन हे आपल्याच राज्यातले आहे असे ते म्हणाले.
-
एवढा मोठा समाज एकत्र जमतो त्याची दखल घेणे आवश्यक- बाळासाहेब थोरात
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढा मोठा समाज एकत्र जमतो त्याची दखल घेणे आवश्यक आहे. ज्यांची जबाबदारी आहे तो गावोगावी भांडण लावत फिरत आहे. याची गंभीर्यपूर्वक स्वतःहून लक्ष घेण्याची गरज मात्र दुर्दैवाने तसे दिसत नाही ही वस्तुस्थिती. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जावं असे ते म्हणाले.
-
धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
धुळे शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वीच धुळे येथे आज येलो अलर्ट देण्यात आला होता. दोन दिवस झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे पिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.
-
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे जरांगेंच्या भेटीला
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगेंच्या भेटीला उपोषणस्थळी गेले आहेत. जरांगेंच्या भेटीनंतर पुन्हा उपसमितीची बैठक होणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगेंमध्ये चर्चा सुरु आहे. कोकण विभागीय आयुक्तही उपस्थित.
-
मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेच उत्तर देऊ शकतील: राज ठाकरे
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन का केलं? ते का परत आले याचं उत्तर फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.त्यामुळे आता मुंबईकरांना त्रास होतोय हे खरं आहे. पण या मागचा तोडगा काय याबद्दलही शिंदेंच सांगू शकतली.असही ते राज ठाकरे म्हणाले आहेत.
-
बारामतीत झालेल्या दोन दिवसाच्या पावसानंतर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठा वाढला, पाणीटंचाई दूर
बारामतीत झालेल्या दोन दिवसाच्या पावसा नंतर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये 63% जलसाठा असल्याचं दिसत आहे. जिल्ह्यातील बारामती प्रकल्पांमध्ये 65 टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांमध्ये 55 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्याला भासणारी पाणीटंचाई यामुळे दूर झाली आहे.
-
हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका: चंद्रकांत पाटील
जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी टीका केली आहे. हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ते पुढे म्हणाले, “ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत.” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
-
जे. पी. नड्डा पुणे दौऱ्यावर, केली गणपती बाप्पाची आरती
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळाला भेट देत गणपती बाप्पाची आरती केली.
-
राजकारणात जलद गतीने निर्णय होत नसतात, प्रकाश आंबेडकरांची जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया
राजकारणात जलद गतीने निर्णय होत नसतात, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, यादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-
आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार, धनंजय देशमुखांची नाराजी
संतोष देशमुख हत्याप्रकरण, आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार
धनंजय देशमुख यांची तपास यंत्रणेवर नाराजी
आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्याही लक्षात राहिला नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप
मी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय – धनंजय देशमुख
परंतु त्याचा कुठेच थांग पत्ता लागत नसल्याचे उत्तर या यंत्रणे कडून येत आहे – धनंजय देशमुख
-
अपघातात चार जण ठार
धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
आता ओबीसी आंदोलनाची हलगी
राज्यातील ओबीसी नेत्यांच्या ऑनलाइन बैठकीत ओबीसी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन करण्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत करतील.
-
आंधळे अद्यापही फरार असल्याने धनंजय देशमुख
आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याने धनंजय देशमुख यांची तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्याही लक्षात राहिला नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप आहे. मी वेळोवेळी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय. पण त्याचा कुठेच थांग पत्ता लागत नसल्याचे उत्तर या यंत्रणे करून येत आहे, असा आरोप देशमुखांनी केला.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल. वाल्मीक कराडच्या जामिनाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला.विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची गैरहजेरी होती.विष्णू चाटेंच्या दोष मुक्तीचा निर्णय सुद्धा न्यायालयाने राखून ठेवला. उर्वरित आरोपींचा वकिलामार्फत दोष मुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल झाला.
-
पवारांनी राज्यात दंगली घडवल्या
जरांगे यांच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. शरद पवार हे जरांगे सारखे सूसाईड बॉम्ब तयार करतात आणि त्याचा वापर करतात हे राज्याचं दुर्देवं आहे. त्याचा राज्यावर परिणाम होईल. पवारांची कारकीर्द पाहिली तर ती अशीच राहिलेली आहे. त्यांनी कुणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही. त्यांचा इतिहास तपासून पाहा. महाराष्ट्र अराजकतेकडे नेणे. जाती जातीत भांडणं लावणे हे काम पवारांनी केलं आहे. वसंतदादांपासून ते वसंतराव नाईक यांच्या काळापर्यंत पवारांनी राज्यात दंगली घडवल्या असा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केला.
-
केंद्रीय गृहमंत्री वर्षावर, घेतले बाप्पाचं दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षावर जाऊन बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतले. ते थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
-
मराठा समाज मागास हे सिद्ध व्हायला हवे-उल्हास बापट
मराठा रिझर्वेशन ते आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे तर ती बरोबर आहे घटनेला धरून आहे फक्त त्याच्यासाठी मराठा मागास आहे मान्य करायला हवे, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले. सामोपचाराने हे 27 टक्के जे आहे ते कसं वाटून घ्यायचं हे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ठरवणं आवश्यक आहे 50 टक्याच्या वर रिझर्वेशन मिळणार नाही ही काळया दगडावरची रेष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
-
‘शेतकऱ्यांसाठी निधी खर्च केला जात नाही’
सर्व योजनांवर निधी खर्च केला जातो. मात्र शेतकऱ्यांसाठी निधी खर्च केला जात नसल्याचे सांगत जळगावातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी सरकारसह प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा नियोजन समितीचा बैठकीत सुद्धा पालकमंत्र्यांसमोर आमदार किशोर पाटील यांनी या विषयावर प्रश्न मांडत खंत व्यक्त केली आहे.
-
आगीत तीन घरे जळून खाक
गोंदिया तालुक्यातील बटाणा येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली. आगीत तिन्ही घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सचिन रहांगडाले, नुतनलाल रहांगडाले, छत्रपाल रहांगडाले अशी पिडीत घरमालकांची नावे आहेत.
-
मराठा आरक्षण उप समितीची बैठक
मराठा आरक्षण उप समितीच्या बैठकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर एकूण तीन मंत्री दाखल. राधाकृष्ण विखे पाटलांसह चार मंत्री आणि प्रशासनातील काही अधिकारी बंगल्यावर उपस्थित आहेत. इतर मंत्री व्हिसीद्वारे उपस्थित असणार आहेत. मराठा आरक्षण उप समितीचे सचिव देखील उपस्थित आहेत. काही वेळातच बैठक होणार सुरू.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी कधी?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी. वाल्मिक कराडच्या जामिनाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची गैरहजेरी. विष्णू चाटेंच्या दोष मुक्तीचा निर्णय सुद्धा न्यायालयाने राखून ठेवला. उर्वरित आरोपींचा वकिलामार्फत दोष मुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल.
-
संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला सीएम केलंय, केवळ मुंबईने नाही – जरांगे पाटील
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या… कायदा मंजूर करा… संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला सीएम केलंय, केवळ मुंबईने नाही… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
बीएमसी, CSMTचा रस्ता मोकळा करा – जरांगे पाटील
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलकांची गर्दी झाली आहे. बीएमसी, CSMTचा रस्ता मोकळा करा… जरांगे पाटलांचं सर्व मराठा आंदोलकांना आवाहन
-
मराठ्यांचा अपमान करू नका – जरांगे पाटील
मराठ्यांचा अपमान करू नका… मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका… आम्हाला आरक्षण हवंय, राजकारण करायचं नाही – जरांगे पाटील
-
मुंबई न बघितलेल्या पक्षांचे चमचे – मनोज जरांगे पाटील…
आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर मनोज जरांगे यांनी निशाना साधला… त्यांना काहीही माहिती नसतं. फक्त गोंधळ घालण्यासाठी आलेले असतात. मुंबई न बघितलेल्या पक्षांचे चमचे… असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणामुळे मुंबईत वाहतूक कोंडी: सलग दुसऱ्या दिवशी ही ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा अमरन उपोषणाचा दुसरा दिवस… महाराष्ट्रभरातून हजारो मराठा समर्थक मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत… मुंबईत येणाऱ्या मुख्य ईस्टर्न फ्री वे महामार्गावर वडाळा–सीएसएमटी दरम्यान मोठ्या प्रमाणात l वाहतूक कोंडी… सकाळपासून वाहने रांगेत, वाहन चालकांना मोठा त्रास… आंदोलनात सहभागी समर्थक राहण्याची व खाण्याची व्यवस्था करत मोठ मोठे ट्रक आणि वाहने मुंबईच्या दिशेने आणत असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी… तर पार्किंग मिळत नसल्याने महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी वाहने पार्क केल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक कोंडी वर परिणाम होत जाम… मुंबईतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस कार्यरत… मात्र पहाटेच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या चाकरमानी आणि वाहन चालकां मध्ये वाहतूक कोंडीमुळे नाराजी… शासनाकडून उपोषणावर तोडगा काढत वाहतूक कोंडी मधून सुटका करण्याची वाहन चालकांची मागणी…
-
मुंबईकरांचे हाल
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगाच रागा लागल्या आहेत.
-
सिंहस्थ प्राधिकरण मधे साधू महंत यांचा होणार समावेश
साधू महंतांच्या नाराजी नंतर शासनाकडून आश्वासन. नाशिकमध्ये झालेल्या संत संमेलनात साधू महंतांनी व्यक्त केली होती नाराजी. प्राधिकरण मधे फक्त अधिकारीच असल्याने साधू महंत झाले होते नाराज..
-
BMC परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्स दाखल
मुंबई महापालिकेच्या परिसरात पिड अॅक्शन फोर्स दाखल झाली आहे. सकाळीपासून मराठा आंदोलक हे मुख्य रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली. मात्र, ते रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात
शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीला ठाकरे ठाण्यात येणार. खारकर आळी येथील सीकेपी हॉल मध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार. आगामी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र
-
Manoj Jarange Maratha Morcha : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सोलापूरात घराघरातून पाठींबा
– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सोलापूरात घराघरातून पाठींबा देण्यात आला आहे.
सोलापुरातील कलाकार असलेल्या जाधव कुटुंबियांनी घरगुती गणपतीसमोर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ देखावा केला असून यासोबतच इको फ्रेंडली गणपती आणि समाज प्रबोधन करणाऱ्या पुस्तकांचा देखील देखावा केलाय
– मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्यक्षात जाता आलं नाही, त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हा देखावा केला असल्याची प्रतिक्रिया जाधव कुटुंबियांनी दिली.
-
पिंपरी-चिंचवड: गुंड पवन बनेटीकडून 2 पिस्तुले जप्त; गुन्हे शाखा युनिट 4 ची कारवाई
पिंपरी-चिंचवड: गुंड पवन बनेटीकडून 2 पिस्तुले जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट 4 ने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात 4 पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसं जप्त केली होती. बाबा शेख गॅंगचा सदस्य आणि तडीपार गुंड पवन देवेंद्र बनेटीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 2 पिस्तुले आणि 2 जिवंत काडतुसे गुन्हे शाखा युनिट चारने जप्त केली.
-
Maratha Reservation Rally : मराठा बांधवांच्या नाश्तापाण्याच्या व्यवस्थेसाठी सरसावला बांधव
मराठा बांधवांच्या नाश्तापाण्याच्या व्यवस्थेसाठी बांधव सरसावला आहे. सीएसटी परिसरात बीडमधल्या ओबीसी बांधवाकडून मराठा आंदोलनसाठी पोह्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अमोल केंद्रे असे या युवकाचे नाव असून, जात पात बाजूला ठेवून माणुसकीसाठी मी इथे आलोय अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
-
Maratha Reservation Rally : सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी
सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली असून मराठा आंदोलक आणि पोलिस यांच्यात चर्चा सुरू आहे. कालपासून मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू असून सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले आहेत.
-
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha – पावसानंतरही मराठा आंदोलक आझाद मैदानात तळ ठोकून आहेl, जरांगेंचा आदेश आल्याशिवाय हलणार नाही
आझाद मैदान परिसरात मध्यरात्री पासून पाऊस कोसळतो आहे. यामुळे मैदान परिसरात चिखल झाला आहे. तरी देखील मराठा आंदोलक मैदानात उपस्थित रहाण्यास सुरुवात झाली आहे. जो पर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तो पर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
-
आझाद मैदानात वाढला डासांचा प्रादुर्भाव, महानगरपालिकेकडून धुराची फवारणी
मुंबईतील आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखल, घाणीचं साम्राज्य पसरल असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून धुराची फवारणी करण्यात आली आहे.
-
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याआधी भाजपची जोरदार बॅनरबाजी
‘चला मुंबईत परिवर्तन घडवूया!’ – गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याआधी भाजपने जोरदार बॅनरबाजी करत शहा यांच्या स्वागताची भव्य तयारी केली आहे.
’गणपती बाप्पा मोरया’ म्हणत भाजपने गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शहा यांच्या दौऱ्याआधीच्या बॅनरबाजीने मुंबईच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
-
Maratha Reservation Rally : आझाद मैदान व मैदानाच्या बाहेरील सर्व आंदोलनकर्त्यांना रेनकोट वाटप
आझाद मैदान व मैदानाच्या बाहेर असणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांना रात्रभर रेनकोट वाटप करण्यात आलं. काल आझाद मैदानात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांना पावसाचा सामना करावा लागला होता. येते 2 दिवस पावसाचा अंदाज असल्याने आज सर्व आंदोलनकर्त्यांना यांना रेनकोट वाटप करण्यात आले आहे.
-
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण होणार आहे. रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.
-
सिडको सेंटरमध्ये मराठा बांधव विश्रांतीसाठी दाखल
वाशीमधील सिडको सेंटरमध्ये मराठा बांधव अजूनही पोहचत आहेत. सिडको सेंटरमध्ये मराठा बांधव हे विश्रांती करण्यासाठी दाखल झाले आहेत. मराठा बांधव मिळेल त्या ठिकाणी आपली वाहन पार्किंग करून विश्रांती घेत आहेत.
-
पाथरीचे आमदार राजेश विटेकर मनोज जरांगे यांच्या भेटीला
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला सत्ताधारी आमदारांनीही पाठींबा दर्शवला आहे. तसेच दिवसभरात अनेक नेत्यांनी जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यानंतर आता परभणीतील पाथरीचे आमदार राजेश विटेकर मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत.
-
नांदेडमध्ये पावसाचं थैमान, शहरातील अनेक भागात पाणी शिरलं
नांदेडला पावसाने झोडून काढलं आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच पावसाचं पाणी शेतात गेल्याने पीकाचं नुकसान झालं आहे.
-
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भाजप आमदार समाधान आवताडेंचा पाठींबा
पंढरपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका सत्ताधारी आमदाराने पाठींबा जाहीर केला आहे. भाजप आमदार समाधान आवताडे यांनी पाठींबा जाहीर केला आहे. आमदार आवताडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. आमदार आवताडे यांनी याबाबतचे पत्र विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं आहे.
-
माता वैष्णोदेवी ट्रॅकवरील भूस्खलनाच्या चौकशीसाठी समिती स्थापन
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 26 ऑगस्ट रोजी श्री माता वैष्णोदेवी जी ट्रॅकवर झालेल्या भूस्खलनाच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती घटनेची चौकशी करेल आणि अहवाल सादर करेल.
-
सीएसएमटी स्थानकावरच मराठा आरक्षण आंदोलकांचं जेवण
सीएसएमचटी स्थानकावरच आंदोलकांनी पंगतीत बसून जेवण केलं. राज्यभरातील आंदोलक या ठिकाणी एकत्र आले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणासाठी सरकारकडून आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
-
पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येतील, क्रेमलिन यांनी केली पुष्टी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. क्रेमलिनने याची पुष्टी केली आहे. भारत आणि रशियामधील धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ही भेट एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
-
भाजपा आमदार सुरेश धस उपोषणस्थळी पोहोचले, जरांगे पाटलांशी चर्चा
भाजपाचा पहिला नेता जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी पोहोचले. सुरेश धस यांनी उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो तोडगा काढू असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं.
-
आमचं सरकार मराठा समाजाचे सगळे प्रश्न हाताळत आहे- बावनकुळे
मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने आणि परवानगी सरकारने दिली आहे. आमचा प्रयत्न आहे की, आमचं सरकार मराठा समाजाचे सगळे प्रश्न हाताळत आहे. मराठा समाजाला जे काही जास्तीत जास्त देता येईल ते देणार. याआधीच्या काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. आम्ही जे काही द्यायचं ते आम्ही दिलं आहे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणाच्या ताटात जाऊ नये अशी भूमिका आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
-
जरांगे पाटलांचं उपोषण उद्याही सुरु राहणार
आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरु आहे. आता एक दिवसाची मुदतवाद दिली आहे. त्यामुळे उद्याही उपोषण सुरु राहणार आहे. आरक्षण घेत नाही तो पर्यंत काही जात नाही, असा इशाराही जरांग पाटील यांनी दिला आहे.
-
आझाद मैदान परिसरात आंदोलकांकडून संध्याकाळच्या जेवणाची तयारी
आझाद मैदान परिसरात आंदोलकांकडून संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरु झाली आहे. सोबत आणलेला शिधा शिजवून जेवणाची तयारी केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत आलेल्या आंदोलकांकडून एक महिन्याचा शिधा आणण्यात आला आहे. मोबाईल टॉर्च लावून स्वयंपाक बनवला जात आहे.
-
मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जाण्यासाठी सरकारचा डाव – जरांगे पाटील
जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे.
-
मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल – जरांगे पाटील
जरांगे पाटील म्हणाले की, ‘आंदोलकांना त्रास दिला जात आहे, सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करावं. तुम्ही आम्हाला इथे त्रास दिला तर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हीही त्रास देऊ. मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल.’
-
इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहात, मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप
जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका.
-
सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे – जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, सरकारला ही संधी आहे, आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत.
-
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन दाखवलं- उदय सामंत
उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली होती आणि आरक्षण दिलेलं आहे आणि टिकवलं आहे. मराठा आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊन दाखवलं आहे, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.
-
माझगाव फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी
माझगाव फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनांची लांब रांग आहे. मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या मराठा बांधवांची वाहने दूरवरून दिसतात.
वाहतुकीमुळे लोक त्यांच्या वाहनांमधून उतरून चालत जात आहेत.
-
पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल, पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाला अटक
पिंपरी चिंचवड : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तरुणाला अटक
-सोशल मीडियावर पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे
-जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीजवळ हा सगळा प्रकार घडला आहे
-ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.
-त्याच्यासह आशिष वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी गुरुवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
-
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे अजितदादाचा पोलीस बंदोबस्त वाढवला
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे अजितदादाचा पोलीस बंदोबस्त वाढवला
पोलिसांनी साखळी करत अजितदादांना दिला बंदोबस्त
-
मुंबई – गोवा महामार्गांवर भोस्ते घाटात वाहतूक कोंडी
मुंबई- गोवा महामार्गांवर भोस्ते घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. घाटामधे अचानक ट्रक बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाली असून भोस्ते घाटात एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
-
सोलापुरात डीजे मुक्ती कृती समितीविरोधात डीजेचालक आक्रमक
कर्णकर्कश आवाजात डीजे लावणारे लोक सोलापुरातील नसून पुण्यामुंबईतून येतात. आम्ही सोलापुरातील डीजे व्यावसायिक आवाजाची मर्यादा पाळतो, तरी मात्र तरीही आमच्यावर कारवाई होते. आम्ही कर्ज काढून साऊंड सिस्टीम आदी वस्तू घेतलेल्या आहेत. मग आम्ही जगायचे कसे? असा सवाल सोलापुरातील डीजे चालकांनी केला आहे.
-
रस्ता नसल्याने रुग्णालयात नेत असताना वृद्धेचा मृत्यू
तळोदा तालुक्यातील हातबारी ते लेखापूर रस्ता नसल्यामुळेआदिवासी वयोवृद्ध महिलेला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना तिने प्राण सोडल्याची घटना घडली आहे.
-
हे आंदोलन कायद्याचे तोडफोड करणारे – सदावर्ते
जरांगे यांचे हे आंदोलन कायद्याचे तोडफोड करणारे आहे. आम्ही पोलिसांना तक्रार केली आहे. हे आंदोलन बेकायदेशीर असून कायद्याचे भंग करून आंदोलन सुरू असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
-
मराठा आंदोलक पुन्हा आपल्या वाहनतळाच्या दिशेने रवाना
अनेक मराठा आंदोलक हे आपली वहानांच्या दिशेने पुन्हा रवाना झाले आहेत. वाहनतळावर जाण्यासाठी त्यांनी हार्बर रेल्वेचा वापर केला आहे. मराठा आंदोलक आज जे सकाळी नवी मुंबई मार्गाने आले त्यांच्या गाड्या गोवंडी आणि आसपासच्या परिसरात लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आता आपल्या गाडी कडे जात आहेत.
-
नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात
नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कंधार व माळाकोळी मंडळात सर्वाधिक 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, CRPF, नांदेड महानगरपालिका व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे.
-
गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंविरोधात केली तक्रार
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांना कात्रीत पकडले आहे. जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोदात ऑनलाईन पद्धतीने एक तक्रारही दाखल केली आहे.
-
मुंबई-चर्चगेट परिसरात मराठा आंदोलक दाखल
अनेक मराठा आंदोलक चर्चगेट परिसरात दाखल झाले आहेत. भर पावसात आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. पाऊस सुरू असल्याने चर्चगेटच्या बोगद्यात मराठा आंदोलकांनी घेतला आसरा.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (30 ऑगस्ट) उद्या ठाण्यात दाखल, मनसे सैनिकांची घेणार बैठक
शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला ठाकरे ठाण्यात येणार आहेत. खारकर आळी येथील सीकेपी हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा असणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार असल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रथमच राज ठाकरे ठाण्यात बैठक घेणार आहेत. बैठकीला मनसेच्या पदाधकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. उद्या सकाळी (30 ऑगस्ट) 11 वाजता राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत.
-
खासदार बजरंग सोनवणे आणि खासदार निलेश लंके शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
खासदार बजरंग सोनवणे आणि खासदार निलेश लंके यांनी जरांगे पाटील यांची आंदोलनास्थळी भेट दिली. जरांगे पाटील यांची भेट घेऊन हे दोन्ही खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
-
बजरंग सोनवणे आणि निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि निलेश लंके यांनी आज मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या जालना येथील आंदोलनाला भेट दिल्यानंतर हे दोन्ही खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. या भेटीत मराठा आरक्षण आणि राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.
-
राज्यातील सर्वात उंच गणेश मूर्ती नागपुरात, 7 मूर्तिकारांनी 45 दिवसात बाप्पाची विशाल मूर्ती घडवली
राज्यातील सर्वात उंच गणेश मूर्ती नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपुराच्या दाभा परिसरात 51 फूट उंच गणरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे. 7 मूर्तिकारांनी 45 दिवसात बाप्पाची ही विशाल मूर्ती घडवली आहे.
-
जळगावात मराठा समाज आक्रमक, जळगाव-चांदवड राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला
जळगावच्या चाळीसगावमध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी अचानक तळेगाव येथे जळगाव-चांदवड राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला. “फडणवीस यांना आमदार इकडचे तिकडे करता येतात, परंतु आमच्या मुलांचा त्रास दिसत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलकांनी आपला रास्ता रोको मागे घेतला.
-
निंबाळकर , कैलास पाटील , अभिजीत पाटील जरांगेंच्या भेटीला
आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. निंबाळकर , कैलास पाटील , अभिजीत पाटील उपोषणस्थळी जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. आंदोलनाबाबत त्यांच्यांशी बातचितही केली.
-
जोरदार पावसातही मराठा आंदोलक ठाम, टेम्पो गॅस लावून बनवतात जेवण
मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते आपापल्या टेम्पोत गॅस लावून जेवण बनवत आहेत. सध्या मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसातही मराठा आंदोलक मुंबई फ्री वे जवळील डोंगरी रोडवर आपला टेम्पो लावून त्याच्या आधाराने गॅस पेटवून जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आंदोलकांनी सोबत एक महिन्याचं रेशन आणलं असून ‘आरक्षण घेऊनच परत जाणार, नाहीतर आमची तिरडी जाईल,’ अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, श्रीगोंद्यात तणावाचे वातावरण
महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी हा प्रयत्न केला. कांद्याच्या घसरलेल्या दरासंदर्भात अजित पवारांनी भाष्य करावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, अजित पवारांनी आपल्या भाषणात कांद्यावर कोणताही शब्द न काढल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाषणाच्या शेवटी त्यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कापसे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
विहिरीत कार कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी राजूर रोडवरील गाडेगव्हाण फाट्याजवळील विहिरीत कार कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू. सर्वांचे मृतदेह काढले बाहेर. आज सकाळच्या सुमारास आय ट्वेंटी कार राजुर कडून टेंभुर्णीच्या दिशेने निघाली असता विहिरीत कोसळली होती. सकाळपासूनच पोलीस कर्मचाऱ्यांसह भोकरदन अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक घटना स्थळावर दाखल होवून मृत्यूदेह बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु. सद्यस्थितीला एकूण 5 जणांचे मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आले आहेत.
-
मराठा आंदोलक CSMT स्थानकात दाखल
मराठा आंदोलक CSMT स्थानकात दाखल. काही आंदोलक रेल्वे स्टेशन परिसरात झोपले आहेत. CSMT स्थानकाचा परिसर मराठा आंदोलकांनी फुलून गेला आहे.
-
सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वाची बैठक, स्वत: मुख्यमंत्री उपस्थितीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथिगृहावर दाखल झाले आहेत. सह्याद्री अतिथिगृहावर महत्वाची बैठक. मंत्री उदय सामंतही सह्याद्री अतिथिगृहावर पोहोचले आहेत.
-
बजरंग सोनावणे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल
बीडचे शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानातील त्यांच्या व्यासपीठावर आले आहेत.
-
बी. सुदर्शन रेड्डींना मविआचा पाठिंबा
बी. सुदर्शन रेड्डींना मविआने पाठिंबा दिला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बी. सुदर्शन रेड्डी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.
-
जरांगेनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली- हाके
“जरांगे नावाच्या काडीपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकूमशाह आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. हा आरक्षणाचा लढा नाही. जरांगेनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली, ते म्हणले मी सरकार उलथवून लावणार. सरकार उलथवण्यासाठी जरांगेंसह अजित पवारांचे आमदार आणि खासदार सामील आहेत,” असं हाके म्हणाले.
-
जरांगे नावाच्या काडीपेटीचा ज्वालामुखी केला- लक्ष्मण हाके
“या महाराष्ट्रात झुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी रचना संपवण्याचा घाट घातला जात आहे. जरांगे नावाच्या काडीपेटीचा ज्वालामुखी केला. हे काम सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी केलं,” अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली.
-
नांदेडच्या लोहा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
नांदेडच्या लोहा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात पावसाळा जोर वाढाला. लोहा तालुक्यातील पिंपळदरी गावात पाणी शिरलं. पिंपळदरी गावातील रस्त्याला नाल्याचं स्वरूप आले.
-
जे जे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद
मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जे जे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सीएसटीकडे येणारी रस्त्यांवरची वाहतूक खोळंबली आहे.जे जे फ्लायओव्हरवरुन येणारी जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
-
ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ -संदीप क्षीरसागर
आझाद मैदानावर बीडचे दोन आमदार जरांगेंच्या उपोषणस्थळी पोहचले. मनोज जरांगे हे सर्व समाजासोबत आहे. सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. तर आमदार प्रकाश सोळंके पण यावेळी हजर होते.
-
अमरावती-मुंबई विमान सेवा ठप्प
२१ ऑगस्टपासून तांत्रिक बिघाडामुळे अमरावती-मुंबई विमान सेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. एअर अलायन्सच्या ATR-72 विमानाची दुरुस्ती सुरू असल्याने उड्डाण थांबले आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
-
मन्याड नदीने ओलांडली धोक्याची पातळी
नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार सुरू आहे. मन्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मन्याड नदीचे रुद्र रूप समोर आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेड – हैदराबाद महामार्ग दुसऱ्या दिवशीही बंदच आहे. कालपासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.
-
सरकारचे पुन्हा महाविकास आघाडीवर खापर
जरांगे पाटलांशी चर्चा करू त्यातून मार्ग निघू शकेल , त्यांचेकडून निरोप आला की चर्चा करता येईल. यापुर्वी शासनाची भुमिका होती की आरक्षण देताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले मात्र मविआच्या नाकर्तेपणामुळे ते गेल्याची टीका त्यांनी केली.
-
सरकारची पूर्ण सहानभूती
जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची सहानभूती आहे. सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केला नाही. त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या आहेत. विशेषतः हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी दाखला देण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे अशी प्रतिक्रिया मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
-
जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया
“जरांगे पाटील आज दुपारपर्यंत पोहोचतील अशी माहिती होती. परंतु ते त्याआधीच पोहोचले आहेत. अद्याप उपसमितीची बैठक झाली नाही. त्यांच्या मागण्यांचे निवेदन आले की ठरवता येईल. ती बैठक आज किंवा उद्या होईल. हैदराबाद गॅझेटबाबत अभ्यास सुरू आहे. त्यानंतर कारवाई आपण करू,” अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली.
-
अमरावती-मुंबई विमान सेवा ठप्प
अमरावती-मुंबई विमान सेवा ठप्प झाली आहे. 21 ऑगस्टपासून तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांचं नियोजन कोलमडलं आहे. एअर अलायन्सच्या ATR-72 विमानाची दुरुस्ती सुरू आहे. 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण या योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरू झाली होती.
-
जरांगेंच्या सर्व मान्यबाबत कार्यवाही सुरू, विखे पाटील
नुकताच विखे पाटील यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांबाबत सध्या कार्यवाही सुरू आहे
-
मुंबईकरांना त्रास देऊ नका- जरांगे पाटील
मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
गडबड गोंधळ करू नका- जरांगे पाटील
गडबड गोंधळ करू नका, लोकांचे ऐका आपल्या समाजाचे 70 वर्ष वाटूळे झाले हे एकाही मराठ्याने विसरू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
-
पोलिसांना सहकार्य करा
सरकारने परवानगी दिली त्यामुळे त्यांचे आभार मानतो. पोलिसांना सहकार्य करा, गाड्या सांगतील तिथे पार्क करा, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप
सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मुंबईला यावे लागले असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
आझाद मैदानावर आंदोलकांची तूफान गर्दी
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसत आहेत.
-
जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल
मनोज जरांगे पाटील हे नुकताच आझाद मैदानात दाखल झाले आहेत. उपोषणापूर्वी त्यांनी शिवरायांना अभिवादन केले आहे.
-
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात धडकले
मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले असून त्यांचे मंचावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात उपोषणाला सुरूवात होणार आहे.
-
Mumbai Traffic Police Advisory : मराठा मोर्चाने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प
-
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha : आझाद मैदानात उसळलं भगवं वादळ
तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात ते आझाद मैदानात येऊन मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधवही मुंबईत आले असून आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात अक्षरश: भगवं वादळ उसळलं आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येथे आल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून वाहतुकीच्या मार्गांतही अनेक बदल करण्यात आले आहेत.
-
Maratha Aarakshan protest : एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी गजबजला आजाद मैदानाचा परिसर
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली असून थोड्यात वेळात आझाद मैदानात ते दाखल होऊन उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत असून आझाद मैदानाच्या परिसरात आंदोलक दिसत आहेत. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
-
जळगाव शहराचे नूतन पोलीस उपअधिक्षक नितीन गणापुरे यांनी स्वीकारला पदभार
जळगाव शहराचे नूतन पोलीस उपअधिक्षक नितीन गणापुरे यांनी पदभार स्वीकारला . पोलीस उपधीक्षक गणापुरे यांनी पदभार स्वीकारताच रात्रीच्या वेळी जळगाव शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी केली. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिस उपअधीक्षक यांनी चर्चा केली .
-
Manoj Jarange Patil in Mumbai : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. कोणकोणत्या मार्गावर वाहतूक बंद असेल, पर्यायी मार्ग कोणते वापरावेत यासंदर्भात ट्विट करत सूचना देण्यात आल्या आहेत.
In view of Morcha at Azad Maidan on 29th August 2025, following traffic arrangements will be in place from 0.00 hrs on 29th August till further orders.
Citizens are requested to plan commute likewise.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/4DSU5LbMFN
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 28, 2025
-
Manoj Jarange Patil Maratha Morcha : अवघ्या काही मिनिटांत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात होणार दाखल
अवघ्या काही मिनिटांत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार आहेत. सीएसएमटीचा परिसर, मुंबई महानगरपालिकेचा भाग, आझाद मैदान आणि वाडी बंदर परिसरात हजारो मराठा आंदोलक हजर असून सर्वांनाच जरांगे यांची प्रतिक्षा आहे.
-
हिंगोली- मुसळधार पावसाचा इशारा असल्याने वसमत विभागातील शाळांना सुट्टी जाहीर
हिंगोली- मुसळधार पावसाचा इशारा असल्याने वसमत विभागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती वसमत उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली.
-
Manoj Jarange Maratha Morcha : मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावर होणार जंगी स्वागत
मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे हे अवघ्या काही वेळात मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार असून तेथे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
-
Maratha Aarakshan protest : मुंबई सेल्फी पॉइंट सिग्नलवर मराठा बांधव आक्रमक
मुंबई सेल्फी पॉइंट सिग्नल वर मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सिग्नलवर सर्व मराठा बांधव रस्त्यावर बसल्याने सर्व वाहन रोखण्यात आली आहेत.
-
Manoj Jarange Patil Maratha Morcha : मनोज जरांगेंचा महामोर्चा मुंबईत धडकला
मनोज जरांगे पाटील यांचा महामोर्चा मुंबईत धडकला, थोड्याच वेळात जरांगे आझाद मैदानात होणार दाखल. काही अटी-शर्तींसह जरांगे यांना या मोर्चाची, आंदोलनाची परवानगी देण्यात आली असून आझाद मैदानावर 5 हजार आंदोलकांनाच एन्ट्री देण्यात येणार आहे.
-
Maratha Reservation Rally – मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरागे यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी हजारो बांधव मुंबईकडे रवाना
पुणे – मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरागे यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी पुण्यातून हजारो बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पुण्यातील कात्रज मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधव रवाना झाले .
-
मुंबईच्या आझाद मैदानात भगवंत वादळ उभं राहायला सुरुवात
मुंबईच्या आझाद मैदानात भगवंत वादळ उभं राहायला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांच्यावर स्तुतीसुमने ऊधळणार्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू, मागे हटला नाही हटणार नाही, नेता लय खंबीर , तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर अशा गाण्यांनी सुरुवात झाली आहे.
एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. कपडे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करून हे आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेत.
-
मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलक जमण्यास सुरवात.
मुंबईच्या वेशीवर म्हणजेच ठाण्यातील आनंद नगर जकात नाका या ठिकाणी मराठा आंदोलक जमण्यास सुरवात झाली असून हळूहळू ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करत आहेत.
-
जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव धुळ्यातून मुंबईकडे रवाना
जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव धुळ्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणत हजारो बांधव धुळे रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेन रवाना.
गेल्या अनेक वर्षाची आरक्षणाची मागणी होत आहे, मात्र सरकारचं सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आरक्षणाशिवाय हटणार नाही हा उद्देश घेऊन मराठा बांधव रेल्वे तसेच खाजगी वाहनांनी मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत.
-
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाला असून थोड्याच वेळात ते आझाद मैदानात पोहोचतील. जरांगेंचा ताफा ईस्टर्न फ्रीवेवर असून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published On - Aug 30,2025 7:43 AM
