AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती

मुंबईतील धारावीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. धारावीत प्रचारादरम्यान काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. कार्यकर्त्यांचा हा आक्रमकपणा धक्काबुक्कीपर्यंत गेला. या घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती
धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
| Edited By: | Updated on: Nov 10, 2024 | 8:48 PM
Share

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रचार केला जातोय. मोठमोठे नेते महाराष्ट्रात येऊन आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. निवडणुकीत मतदारांना पैशांचं आमिष दाखवून मतदान होऊ नये याची संपूर्ण काळजी सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांकडून घेतली जात आहेत. यातूनच राज्यभरातील विविध भागांतून कोट्यवधी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. असं असताना राज्यात निवडणुकीच्या वातावरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. पण तरीही काही ठिकाणी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईच्या धारावीतून अशाच प्रकारची एक मोठी बातमी समोर येत आहे.

धारावीत काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले आहेत. प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. ही धक्काबुक्की इतकी वाढली की दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित मतदारसंघात काँग्रेसकडून ज्योती गायकवाड या उमेदवार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून राजेश खंदारे हे उमेदवार आहेत.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या पतीला धक्काबुक्कीचा आरोप

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जयश्री रामच्या घोषणा देत खासदार वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसे यांना देखील धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे धारावीत तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. घटनेनंतर संबंधित परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. दरम्यान, घटनेनंतर आता काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते धारावी पोलीस ठाण्याबाहेर जमायला सुरुवात झाल्याची माहिती आहे.

संबंधित घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे 9 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत अशाप्रकारची घटना घडणे अनपेक्षित आहे. आता या घटनेनंतर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात? की यातून राजकीय वाद जास्त चिघळतो? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....