AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis on Sharad Pawar : 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं? पत्र कुणी लिहिलं?, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवार, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 18, 2024 | 10:36 AM
Share

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. राज्यात जी राष्ट्रपती राजवटी लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी एकेठिकाणी बोलताना म्हटलं. त्यानंतर tv9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टिपण्णी केली. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. tv9 मराठीवर झालेल्या मुलाखतीत फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

मी फडणवीस यांचा आभारी आहे. मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही की, मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की, राजकारणात माझं स्थान काय आहे, असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रतिवार केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

आमची जी एकत्र बैठक झाली ती शरद पवार यांनी मान्य केली. या बैठकीत असं ठरलं की थोडा वेळ घालवायचा. म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लावता येते. राज्यपाल प्रत्येक पक्षाला विचारतात की तुम्हाला सरकार स्थापन करायचं आहे का? सगळ्यांनी नकार दिला तरच मग त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते. पवारसाहेबांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही नाही म्हटलं तर शिवसेना एकटी सरकार स्थापन करू शकणार नाही. आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेस सरकार स्थापन करू शकणार नाही. तेव्हा मी महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला स्थिर सरकार हवं आहे. म्हणून मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मग आपण सरकार स्थापन करू, असं फडणवीसांनी सांगितलं.

राज्यपालांनी जेव्हा राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी पत्राद्वारे विचारलं. तेव्हा त्याचं उत्तर माझ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ड्राफ्ट झालं. मग ते पत्र अजित पवारांनी शरद पवारांकडे पाठवलं. त्यावेळी शरद पवार हे लीलावती रूग्णालयात संजय राऊतांना भेटायला गेले होते. मग पवारसाहेबांनी सांगितलं की दोन मुद्दे काढा आणि आणखी दोन मुद्दे त्यात अॅड करा. त्या हिशोबाने पुन्हा पत्र ड्राफ्ट झालं. त्यावर अजित पवारांनी सही केली आणि ते पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आलं. मग तीनही पक्षांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला. मग तिसऱ्या पक्षाने म्हटलं की आम्ही सरकार स्थापन करू तरी ते शक्य नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असं फडणवीस म्हणाले.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.