AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून एकीचं बळ दाखवून दिलं आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: BJP became number one party)

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: आघाडी जिंकली, पण भाजपच नंबर वन; आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
| Updated on: Jan 19, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून एकीचं बळ दाखवून दिलं आहे. मात्र, पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात आपणच नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाच्या तर शिवसेना आणि काँग्रेसने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत. सर्वाधिक जागा जिंकून भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी सरपंच निवडीमध्ये मात्र भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: BJP became number one party)

राज्यातील 13,833 ग्रामपंचायतींपैकी 13,769 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपने 3,263, राष्ट्रवादीने 2,999, शिवसेनेने 2,808, काँग्रेसने 2,151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2,510 जागा जिंकल्या आहेत. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीतील सर्वच्या सर्व जागा राजकीय पक्षांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे तिथे सरपंचाची निवड सोपी जाणार आहे. परंतु, ज्या पंचायतमध्ये संमिश्र कौल आलेला आहे, त्या ठिकाणी मात्र सरपंचाच्या निवडीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

काँग्रेसलाही बळ

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून 2014नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. चौथ्या क्रमांकावर का असेना पण काँग्रेसने दोन हजाराहून अधिक जागा जिंकून मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नैराश्याने घेरले होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

पालिकेत सत्तांतर होणार?

दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या निकालाच्या अनुषंगाने आता महापालिकान निवडणुकीची गणितं मांडली जात आहेत. ग्रामपंचायतीमधील विजय म्हणजे आगामी ठाणे, नवी मुंबई, मुंबई महापालिका निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणूक आणि पालिका निवडणुकीचा तसा काहीच संबंध नसतो. पण पालिका निवडणुकीत कडवी झुंज देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याचा मानला जात आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपला हा आत्मविश्वास आवश्यक होता. आता या आत्मविश्वासाच्या बळावरच भाजप पालिका निवडणुकीत चमत्कार घडवू शकते, असं राजकीय निरीक्षकांना वाटतं. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: BJP became number one party)

या निवडणुकीने काय दिले?

ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय पक्षांना अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. भाजपला पुन्हा नंबर वनचं स्थान देऊन महाविकास आघाडीशी टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास या निवडणुकीने भाजपला दिला. शिवसेनेला ग्रामीण भागात मोठं यश देऊन ग्रामीण भागात पक्ष विस्तार करण्याची संधी निर्माण करून दिली. राज्यात दोन्ही काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेचा निर्णय योग्यच होता, यावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब झालं. काँग्रेसने 13 जिल्ह्यात दमदार कामगिरी केली. दोन हजाराच्यावर जागा मिळवल्या. त्यामुळे सर्व काही संपलं नाही, एकदिलाने लढलो तर गतवैभव मिळवणं सहज शक्य आहे, हा आत्मविश्वास या निवडणुकीने काँग्रेसला दिला आहे. तर राज्यात नंबर वन होण्याची संधी आहे. ग्रामीण भागात आपली पकड अजूनही मजबूत आहे, हे या निवडणुकीने राष्ट्रवादीला दाखवून दिलं. त्यामुळे हे चारही पक्ष येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जिंकण्याच्याच जिद्दीने उतरतील, त्यामुळे प्रत्येक निवडणूक चुरशीची आणि रंजक होईल, असं जाणकारांना वाटतं. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: BJP became number one party)

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेनेचं बालेकिल्ल्यातील वर्चस्व अबाधित; अंबरनाथचा गड राखला

अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, ‘नोटा’ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?

(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: BJP became number one party)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...