AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : पन्नास खोके…. पन्नास खोके म्हणजे किती? राज ठाकरेंनी पोलखोल करत थेट आकडाच सांगितला

त्यावर संजय राऊत चटकन बोलले भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. राज ठाकरे बोलले बरोबर ना, 'म्हणजे बँकेतून लोन तर नव्हतं ना घेतलं. त्यामुळे भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं?

Raj Thackeray : पन्नास खोके…. पन्नास खोके म्हणजे किती? राज ठाकरेंनी पोलखोल करत थेट आकडाच सांगितला
Raj Thackeray
| Updated on: Jan 08, 2026 | 10:13 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली आहे. राज आणि उद्धव ठाकरे राज्य कारभार तसेच मुंबईच्या वर्तमान स्थितीवर या मुलाखतीत बोलले आहेत. मराठी माणसाच्या मुद्यावर सुद्धा त्यांनी आपले विचार मांडले आहेत. चारवर्षांपूर्वी शिवसेना फुटली. दोन गट पडले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आज अधिकृत शिवसेना आहे. 2022 साली एकनाथ शिंदे बाहेर पडले, तेव्हा 40 आमदार त्यांच्यासोबत होते. या आमदारांना 50-50 कोटी दिल्याचा आरोप होतो.

त्यावर राज ठाकरे बोलले आहेत. संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला. भाजपने आरोप केलाय की, मुंबई महापालिकेत 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेकडे एवढे पैसे असतात का? आणि जर एवढे पैसे पालिकेत असतील तर हे आमदार 50-50 कोटींना का पळून गेले?

त्यावर राज ठाकरे बोलले, “एक मिनिट… मला त्या गोष्टीबद्दल जरा बोलायचं आहे. ते जे चालू होतं ना पन्नास खोके, पन्नास खोके, पन्नास खोके… मला वाटतं लोकांना नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. हे पन्नास खोके, पन्नास खोके हा विनोदाचा भाग नाही. पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये झाले… 40 आमदार म्हणजे 2 हजार कोटी झाले… हे पैसे कुठून आले? कसे आले?”

त्यावर संजय राऊत चटकन बोलले भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. राज ठाकरे बोलले बरोबर ना, ‘म्हणजे बँकेतून लोन तर नव्हतं ना घेतलं. त्यामुळे भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं?’

हे सगळं हवं आहे यात दुमत नाही

“आज जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडं रस्ते खोदलेत. जिथं जावं तिथं रस्ते खोदलेत, मोठमोठय़ा इमारती उभ्या राहतायत. मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल. हे सगळं हवं आहे यात दुमत नाही. पण एका वेळी ते सगळं काढलेलं आहे. काही तारतम्य असायला पाहिजे. मुंबईच्या खर्चाचाही ताळमेळ बसवला गेला पाहिजे. नाहीतर आतासारखी परिस्थिती ओढवते. मुंबईकर म्हणून तुम्ही जो कर भरता, त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.