AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : अतिवृष्टीने दाणादाण, पण केंद्राची मदत का नाही? शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ, काय सांगितले कारण

Sharad Pawar : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यात हाहाकार माजवला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोपडले. महापूर आला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पण अजून केंद्राची मदत पोहचली नाही. त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केले.

Sharad Pawar : अतिवृष्टीने दाणादाण, पण केंद्राची मदत का नाही? शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ, काय सांगितले कारण
शरद पवार
| Updated on: Oct 05, 2025 | 1:01 PM
Share

Sharad Pawar on Relief Fund : सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी काळा ठरला. या महिन्यातील अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. हातातोडांशी आलेला घास हिसकावला गेला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अतिवृष्टीने शेताला तळ्याचे स्वरुप आले. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेती खरडून गेली. पीकांचं सर्वात मोठं नुकसान झालं. नद्यांच्या काठालगतच्या शेती वाहून गेली. शेतकऱ्यांनी एकरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली. पण सरकारने अद्याप भरीव मदत केलेली नाही. केंद्र सरकारकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप केंद्राकडून घोषणा करण्यात आली नाही. अजून केंद्राची मदत पोहचली नाही. त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केले.

मदतनिधीसाठी शेतकऱ्यांकडून वसुली

साखर कारखान्यांची बैठक बोलवली आहे. त्यात जे नुकसान झाले आहे, त्याविषयी राज्य आणि केंद्राशी कसा सुसंवाद साधावा याविषयीची चर्चा होईल. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मला आश्चर्य याचं वाटतं की, ज्याचं नुकसान झालं. त्यांना मदत करण्याऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्याचा निर्णय घेतला. ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्यांनी या निर्णयाचा फेरनिर्णय घ्यावा अशी विनंती करणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

केंद्राची मदत अद्याप का नाही?

राज्यावर निसर्ग कोपला आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले. त्यांनी राज्याची परिस्थिती मांडली. तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहिल्यादेवीनगरच्या दौऱ्यावर आहेत. पण तरीही केंद्राने राज्याला अद्याप मदत जाहीर केलेली नाही याविषयी पत्रकारांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी आपण केंद्राशी याविषयी संपर्क साधला. त्यावेळी केंद्राने आपल्याला असं सांगितलं की अद्याप अंतिम प्रस्ताव राज्य सरकारने दिलेला नाही, असा दावा पवारांनी केला. त्यामुळे याविषयी भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने लवकर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी पवारांनी केली.

70 लाख एकराहून अधिक पिकांचं नुकसान

गेल्या आठवड्यात राज्याचे कृषीमंत्र्यांनी जवळजवळ 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान राज्यात झाल्याची माहिती भरणे यांनी दिली. नदीकाठची, ओढ्याकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जमीनच वाहून गेली आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झालं आहे. गावात पाणी शिरले आहे. घराची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली होती. पण मदतीचे घोडे कुठं अडलं यावरून शेतकऱ्यांची नाराजी वाढल्याचे दिसते.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report