AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : चार तासांपासून आजी, एक व्यक्ती आणि पाळीव कुत्रा ढिगाऱ्याखाली, मुंबईत बंगला खचला; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. तर घाटकोपरमध्ये एक बंगला खचला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Video : चार तासांपासून आजी, एक व्यक्ती आणि पाळीव कुत्रा ढिगाऱ्याखाली, मुंबईत बंगला खचला; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
bungalow partly collapsed in mumbaiImage Credit source: ani
| Edited By: | Updated on: Jun 25, 2023 | 1:53 PM
Share

मुंबई : मुंबईत कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काल दुपारनंतर मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला. रात्रभर मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे मुंबईतील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर पहिल्याच पावसात मुंबईच्या नालेसफाईची पोलखोलही झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. पावसाची बॅटिंग सुरू असतानाच घाटकोपरमध्ये एक तीन मजली बंगला खचला आहे. हा बंगला खचल्याने त्यात दोनजण अडकले आहेत. गेल्या चार तासांपासून या दोघांनाही बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

घाटकोपर पूर्व येथील चित्तरंजन नगरातील राजावाडी कॉलनीत हा तीन मजली बंगला आहे. तळमजला अधिक तीन मजली हा बंगला आहे. या बंगल्याचे दोन मजले आत आहेत. जोरदार पावसामुळे हा बंगला खचला आणि त्यात एक आजी, एक व्यक्ती आणि एक पाळीव कुत्रा अडकला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं आहे. एनडीआरएफच्या टीमलाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलं असून पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. मात्र, चार तास झाले तरी या दोघांना आणि पाळीव कुत्र्याला बाहेर काढता आलेलं नाही. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

वाहनांचं नुकसान

पहिल्या पावसामुळे मुंबईमध्ये घाटकोपर इथल्या राजावाडी परिसरातील ही तीन मजली इमारत जमिनीत धसली. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या ढिगाऱ्याखाली दोनजण अडकले आहेत. तर चार जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बंगला खचल्याने बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच या बंगल्याला टेकू देण्यासाठी लोखंडी पोल लावण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

मदतकार्य सुरू

दरम्यान, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळला आहे. त्यानंतर तिथे डिझास्टर टीम पोहोचली आहे आणि त्या ठिकाणी मदत पोहोचवली आहे, असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.

मुंबईत जोरदार पाऊस

मुंबईत कालपासून पाऊस सक्रिय झाला आहे. काल दुपारनंतर मुंबईत धुवाँधार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच अवघ्या काही तासात मुंबईतील रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झाला. पावसामुळे काल रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. काल रात्रभर मुंबईत पाऊस सुरू होता. आज सकाळीही मुंबईत सकाळी 10 वाजेपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.