AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन…भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Bhoodan Movement Land: भूदान चळवळ ही भारतीय इतिहासातील मोठी घटना आहे. या काळात अनेक जमिनी श्रीमतांनी, जमीनदारांनी दान केल्या. आता त्या जमिनीविषयी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो लोकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन...भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय
भूदान चळवळ भूदान यज्ञ मंडळ Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: May 09, 2026 | 1:31 PM
Share

Bhoodan Movement Land: भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्याचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. विनोबा भावे यांच्या काळात लाखो जमिनी जमीनदार आणि श्रीमंतांनी दान केल्या होत्या. महाराष्ट्रात भूदान मंडळाची लाखो एकर जमीन आहे. भूदान चळवळीत दान मिळालेल्या जमिनींचा शोध घेऊन त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्यात आले आहे.

भूदान यज्ञ मंडळाची स्थापना

राज्य सरकारने भूदान यज्ञ मंडळाची स्थापना केली आहे. खामगावातील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील रमेश दाणेंची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यवतमाळचे एकनाथ डगवार यांची सचिव पदी वर्णी लागली आहे. भूदान मंडळ हे जमिनींचे वाटप व व्यवहारावर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्रात भूदान मंडळाकडे लाखो एकर जमीन आहे. अद्यापही हजारो एकर जमीन शोधण्याचे मंडळासमोर आव्हान आहे. वाटप केलेल्या जमिनीचा वापर शेतीसाठी होतोय का? याची पाहणी करायची जबाबदारी मंडळाची आहे. याउलट भूदान चळवळीत दान मिळालेल्या जमिनींचा शोध घेऊन त्याचे वाटप करण्याची सुद्धा मंडळाची जबाबदारी आहे.

काय आहे भूदान चळवळ व भूदान यज्ञ मंडळ?

भूदान यज्ञ मंडळ ही आचार्य विनोबा भावे यांनी १८ एप्रिल १९५१ रोजी सुरू केलेल्या भूदान चळवळींतर्गत दान मिळालेल्या जमिनींचे व्यवस्थापन आणि भूमिहीन शेतकऱ्यांमधील वितरणासाठी स्थापन केलेली संस्था आहे.

या मंडळाचा मुख्य उद्देश श्रीमंत जमीनदारांकडून स्वेच्छेने जमीन मिळवून सामाजिक-आर्थिक असमानता कमी करणे आणि गोरगरीब भूमिहीनांना स्वतःची जमीन मिळवून देण्याचा आहे.

आचार्य विनोबाजींनी एप्रिल १९५१ मध्ये देशभर पदयात्रा करून सुरू केलेल्या भूदान यज्ञ चळवळीच्या माध्यमातून ४१ लाख ७७ हजार ७५२ एकर जमिनी मिळवली होती.

देशातील ५ लाख ७४ हजार १६१ भूस्वामींनी आपली जमिनी विनोबाजींच्या या यज्ञात दान दिली होती.

देशात ३ लाख १७२४ भूमिहिन दलित पीडित लाभार्थींना यापैकी ८ लाख ६८ हजार ७६३ एकरचे वाटप करण्यात आले होते.

उर्वरित जवळपास ३३ लाख एकर जमीन कुठे आहे, ज्यांना जमीन वाटप झाली त्यांनी तिचे काय केले, इत्यादीचा शोध घेण्यासाठी प्रत्येक राज्यात भूदान यज्ञ मंडळ स्थापन झाले आहे.

Follow Us
इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी... नाशिक धर्मांतरण
इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी... नाशिक धर्मांतरण.
डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय.....
डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय......
न्यायव्यवस्थेला वाळवी लागले, न्यायालयांवर दबाव आहे; राऊतांचा हल्लाबोल
न्यायव्यवस्थेला वाळवी लागले, न्यायालयांवर दबाव आहे; राऊतांचा हल्लाबोल.
शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच... अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...
शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच... अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे....
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक.
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा.
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग....
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग.....
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM..
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM...
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.