AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲापरेशन सक्सेस, पण वेट ॲंड वॉच, ठाकरेंच्या त्या खेळीचा धसका

Shivsena Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या गटातील 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. असं असलं तरी कायदेशीर आव्हानांमुळे शिवसेना सध्या ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

ॲापरेशन सक्सेस, पण वेट ॲंड वॉच, ठाकरेंच्या त्या खेळीचा धसका
Shinde vs ThackerayImage Credit source: Google
| Updated on: Jun 17, 2026 | 10:43 PM
Share

राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर ऑपरेशन टायगरची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. मात्र आता हे ऑपरेशन काही काळ रखडले जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून वेट अँड वॉचची भूमिका घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत

समोर आलेल्या माहितीनुसार, आज झालेले ऑपरेशन टायगर फुल प्रूफ झालेले असून, त्यात काहीही अडचण नाही. मात्र आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही. कोणतेही पुरावे द्यायचे नाही, अशी वेट अँड वॉचची भूमिका शिवसेनेनी घेतली आहे. कारण यामागे काही तांत्रिक गोष्टी आहेत. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पाऊले टाकली जाणार असल्याचे समोर आले आले आहे. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणले जाणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सुत्रांकडून देण्यात आली आहे.

कायदेशीर बाबी तपासल्या जाणार

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झाले आहेत, मात्र ते माध्यमांशी संवाद साधणार नाहीत. कायदेशीर बाबी लक्षात घेता तूर्तास या सहा खासदारांचा प्रवेश दोन ते तीन दिवस लाबंणीवर पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ठाकरे गटाकडून येणाऱ्या आक्षेपांवर आधी काम केला जाणार आणि नंतर टेक्निकल आणि कायदेशीर बाजू तपासून शिवसेना या सहा खासदारांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ठाकरेंची साथ सोडणाऱ्या 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

ठाकरेंचे कोणते खासदार फुटले?

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!