AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| अहमदनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे.

Video| अहमदनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 12:19 AM
Share

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे. काही जण गुलाबी थंडीचा आनंद घेत बाहेर फीरताना दिसत आहेत. तर अनेकांनी गारवा वाढल्याने घरीच बसणे पसंत केले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू होता. अखेर रविवारी पावसाने विश्रांती दिली. पावसामुळे थंडीत वाढ झाली आहे. कमाल तापमान देखील घटले आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, थंडीत वाढ झाली आहे. थंडी वाढल्याने शहरात दाट धुके पसरल्याचे दिसले धुक्यामुळे सकाळी-सकाळी काही प्रमाणात दृष्यमानताही कमी झाली होती. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, वाहनचालक धिम्या गतीने वाहन चालवत आहेत.

धुक्यामुळे पिकांचे नुकसान

दरम्यान एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे थंडीमुळे पडलेले धुके यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. हरभारा पिकावर आळी पडली आहे. धुक्यामुळे वेचणीसाठी आलेला कापूस भीजल्याने तो वेचताना अनेक अडचणींचा सामना मजुरांना करावा लागत आहे. तसेच धुक्याचा इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या 

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी

शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत – जयंत पाटील

सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.