AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| अहमदनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे.

Video| अहमदनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 12:19 AM
Share

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे. काही जण गुलाबी थंडीचा आनंद घेत बाहेर फीरताना दिसत आहेत. तर अनेकांनी गारवा वाढल्याने घरीच बसणे पसंत केले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू होता. अखेर रविवारी पावसाने विश्रांती दिली. पावसामुळे थंडीत वाढ झाली आहे. कमाल तापमान देखील घटले आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, थंडीत वाढ झाली आहे. थंडी वाढल्याने शहरात दाट धुके पसरल्याचे दिसले धुक्यामुळे सकाळी-सकाळी काही प्रमाणात दृष्यमानताही कमी झाली होती. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, वाहनचालक धिम्या गतीने वाहन चालवत आहेत.

धुक्यामुळे पिकांचे नुकसान

दरम्यान एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे थंडीमुळे पडलेले धुके यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. हरभारा पिकावर आळी पडली आहे. धुक्यामुळे वेचणीसाठी आलेला कापूस भीजल्याने तो वेचताना अनेक अडचणींचा सामना मजुरांना करावा लागत आहे. तसेच धुक्याचा इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या 

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी

शिराळा पोलीस ठाण्याच्या कामगिरीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी; राज्यातील पोलीस उत्तम काम करत आहेत – जयंत पाटील

सिंधुदुर्गातून गोव्याला जाणारे कृष्णा बार्ज समुद्रात बुडाले, चार जण बेपत्ता

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.