AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी

अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना मदत मिळायला हवी. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत; विशेष मदत पॅकेजची घोषणा करा, राजू शेट्टी यांची मागणी
राजू शेट्टी
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 7:03 AM
Share

सांगली : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा पहायला मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी भरडून निघत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यंदाही अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना मदत मिळायला हवी. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे. ते मिरज तालुक्यातील लिंग्णूर, बेडग, खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची देखील उपस्थिती होती.

जिल्ह्यात साडेचार हजार कोटींचे नुकसान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील 60 ते70 हजार एकरावरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर घडकुज. दावन्या अशा विविध प्रकारचे रोग पडल्याने द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. द्राक्ष बागासाठी एकरी चार ते पाच लाखांचा खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा सरासरी आकडा हा चार ते साडेचार हजार कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. राजू शेट्टी यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहाणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.

इतर पिकांनाही फटका

दरम्यान अवकाळी पावसामुळे केवळ द्राक्ष बागांचेच नाही तर इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक पूर्णपणे आडवे झाले आहे, गव्हासोबतच हारभारा, ऊस, धान या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. वातावरणात झालेले बदल आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभाऱ्यावर आळी पडली आहे. तर वेचणीसाठी आलेला कापूस पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या 

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Omicron : ओमिक्रॉनचे 8 रुग्ण आढळल्याने राज्याचे धाबे दणाणले, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशी बैठक

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.