Rohit Pawar : ‘जर कुणाला वाटत असेल आम्ही सुनेत्रा काकींना कंट्रोल करू शकतो, तर..’ रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
Rohit Pawar : "अजितदादांच्या यांच्या पक्षाचे जे कोणी चार लोक आहेत, त्यांनी त्या विषयाला जिवंत ठेवलय. त्याशिवाय त्यांचं महत्व दिसत नाही. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की, राजकारण करण्याची ही वेळ नाही" असं रोहित पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या म्हणून तुम्ही स्टंट करताय, विलिनीकरणाची चर्चा करताय असा आरोप तुमच्यावर होतोय. त्यावर रोहित पवार बोलले आहेत. “कुठे काही तिथे घडलेलं नाही. आम्ही सर्वजण तिथे दु:खात होतो. पवारसाहेबांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. तुम्ही बघितलं असेल दुसऱ्यादिवशी तिथे कुठे काही अडचण येऊ नये. म्हणून लोकांच्या हितासाठी पवारसाहेबांनी स्टेटमेंट वाचून दाखवलं. कॅमेऱ्याकडे बघून स्टेटमेंट दिलेलं नाही. पवार साहेबांना वाचून दाखवावं लागलं. ते भावनिक झालेले. अशी आमची परिस्थिती होती” असं रोहित पवार म्हणाले.
“तुम्ही राजकारण करत आहात. विलिनीकरण शब्द आम्ही जास्त वापरला की त्यांनी. अजितदादांच्या यांच्या पक्षाचे जे कोणी चार लोक आहेत, त्यांनी त्या विषयाला जिवंत ठेवलय. त्याशिवाय त्यांचं महत्व दिसत नाही. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की, राजकारण करण्याची ही वेळ नाही” असं रोहित पवार म्हणाले.
‘कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो’
“पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी आहेत. तिथे वागत असताना स्टेजवर सांभाळून वागा महाराष्ट्र बघतोय. महिलांचा आदर ठेवा” असं रोहित पवार यांनी सुनावलं. “दादांचं आमदार, कार्यकर्त्यांवर, महाराष्ट्रावर प्रेम होतं. जायला कोणाला कुठे जागा द्यायची हे ते नेते ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करतोय. आम्ही भावनिक मुद्दा काढतो. काकींचा आदर आहे. सांभाळून वागा आणि सांभाळून बोला” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
थोड्या दिवसाने लगचे कळेल, की ताकद काय असते
“काकींचं भाषण मी ऐकलं. त्यांचा संदेश चांगला होता. बाकीच्यांचं भाषण ऐकलं नाही. बाकीच्यांचं भाषण पूर्वीही चांगलं नव्हतं आताही नाही. कंटेट नव्हता. सुनेत्रा काकी सक्षम महिला आहे. पवार परिवाराच्या घटक आहेत. त्या पत्रकार परिषदेला सामोरे जाऊ शकतात. वाटेल तेव्हा मीडियाशी बोलू शकतात. जर कुणाला वाटत असेल आम्ही सुनेत्रा काकींना कंट्रोल करू शकतो. दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना कंट्रोल करू शकतो. तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसाने लगचे कळेल, की ताकद काय असते आणि नेता पार्टी कसा चालवतो हे दिसेल. या चार नेत्यांनी सांभाळून राहा. सांभाळून वागा” असा रोहित पवार यांनी इशारा दिला.
