बिनविरोध निवडणुकीवरून संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले, भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक…
महापालिकेच्या निवडणुकीचे वारे राज्यात वाहत आहे. 29 महापालिकेचे मतदान 15 जानेवारी होणार आहे. त्यापूर्वी गंभीर आरोप केली जात आहेत. बिनविरोधात निवडणुका होत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, बिनविरोध निवडणुका होत असल्याने जोरदार टीका केली जात आहे. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतंय की, बिनविरोध सरळ मार्गाने झाली नाही. निवडणूक आयोगाकडून राहुल नार्वेकर यांनी क्लीनचीट देण्यात आली. बिनविरोध निवडणुका ही धमकी, पैसे आणि यंत्रणांचा गैरवापर याच्यामुळे झालेली आहे. निवडणूक आयोगाने पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही क्लीनचीट दिली. पैसे देऊन ज्याठिकाणी लोकांनी टोकण घेतले, त्यांना अर्ज भरू दिली नाहीत. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार आहेत.
शिवसेना आणि मनसेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? की डोळे नसून त्यांच्या डोळ्यात गारगोट्या आहेत… त्यांना जर हे दिसत नसेल ही स्थिती. जर हे सर्व निवडणूक आयोगाला दिसत नसेल तर निवडणूक आयोगा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो.
पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, 70 ठिकाणी महाराष्ट्रात बिनविरोध होतात या निवडणूक आयोगाच्या काळात. यापूर्वी किती झाले हे आम्हाला दाखवा ना.. या महाराष्ट्रात मोठंमोठे नेते होऊन गेले. पण कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. मनोहर जोशी होते, नगरसेवक पण कधी झाली का बिनविरोध? मग हे छपरी टपरी शिंदे आणि भाजपाचे गुंड लोक हे बिनविरोध निवडून आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचीट देतयं.
निवडणूक आयोगाचा क्लीनचीटचा हा कारखाना देशासाठी आणि राज्यासाठी धोकादायक आहे. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाने घोटाळा केला, नियमाच्या बाहेर जाऊन काम केले जातंय, कायद्याचे उल्लंघन केलंय. सत्ताधारी पक्षाला मदत होईल, असे काम केले जातंय. पण निवडणूक आयोगाला या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो.
