AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिनविरोध निवडणुकीवरून संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले, भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक…

महापालिकेच्या निवडणुकीचे वारे राज्यात वाहत आहे. 29 महापालिकेचे मतदान 15 जानेवारी होणार आहे. त्यापूर्वी गंभीर आरोप केली जात आहेत. बिनविरोधात निवडणुका होत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

बिनविरोध निवडणुकीवरून संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले, भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक...
sajnya raut
| Updated on: Jan 06, 2026 | 10:27 AM
Share

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, बिनविरोध निवडणुका होत असल्याने जोरदार टीका केली जात आहे. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतंय की, बिनविरोध सरळ मार्गाने झाली नाही. निवडणूक आयोगाकडून राहुल नार्वेकर यांनी क्लीनचीट देण्यात आली. बिनविरोध निवडणुका ही धमकी, पैसे आणि यंत्रणांचा गैरवापर याच्यामुळे झालेली आहे. निवडणूक आयोगाने पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही क्लीनचीट दिली. पैसे देऊन ज्याठिकाणी लोकांनी टोकण घेतले, त्यांना अर्ज भरू दिली नाहीत. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार आहेत.

शिवसेना आणि मनसेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? की डोळे नसून त्यांच्या डोळ्यात गारगोट्या आहेत… त्यांना जर हे दिसत नसेल ही स्थिती. जर हे सर्व निवडणूक आयोगाला दिसत नसेल तर निवडणूक आयोगा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, 70 ठिकाणी महाराष्ट्रात बिनविरोध होतात या निवडणूक आयोगाच्या काळात. यापूर्वी किती झाले हे आम्हाला दाखवा ना.. या महाराष्ट्रात मोठंमोठे नेते होऊन गेले. पण कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. मनोहर जोशी होते, नगरसेवक पण कधी झाली का बिनविरोध? मग हे छपरी टपरी शिंदे आणि भाजपाचे गुंड लोक हे बिनविरोध निवडून आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचीट देतयं.

निवडणूक आयोगाचा क्लीनचीटचा हा कारखाना देशासाठी आणि राज्यासाठी धोकादायक आहे. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाने घोटाळा केला, नियमाच्या बाहेर जाऊन काम केले जातंय, कायद्याचे उल्लंघन केलंय. सत्ताधारी पक्षाला मदत होईल, असे काम केले जातंय. पण निवडणूक आयोगाला या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो.

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....