AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खावटी योजनेची अंमलबजावणी रखडली, सहा महिन्यानंतरही लाभार्थी वंचित, रोजगारासाठी स्थलांतर

खावटी योजनेची अंमलबजावणी रखडली असल्यामुळे सहा महिन्यानंतरही लाभार्थी वंचित आहेत. Tribal People Khavati Scheme

खावटी योजनेची अंमलबजावणी रखडली, सहा महिन्यानंतरही लाभार्थी वंचित, रोजगारासाठी स्थलांतर
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 09, 2020 | 7:11 PM
Share

नंदुरबार: राज्यातील आदिवासी कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारने खावटी अनुदानाची घोषणा केली. मात्र, आदिवासी विकास विभागाने तयारी करून ही शासनाच्या दिरंगाईचा फटका राज्यातील आदिवासी कुटुंबांना बसत आहे. कोरोना काळात आदिवासी कुटुंबाना मदत व्हावी, यासाठी आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करत खावटी अनुदान देणार असल्याची घोषणा केली. अनुदान देण्याच्या घोषणेला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला आला आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीच्या मार्गातील अडथळे दूर होत नाहीत. अनेक आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाली आहे. या कुटुंबांना सरकारी मदत कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे. (Tribal People facing problems due to not implementation of Khavati Scheme)

योजनेचे स्वरुप उत्तम अंमलबजावणी गरजेची

कोरोना विषाणूमुळे भरडल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाला दिलासा देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान देण्याची घोषणा केली. सुरुवातीला या घोषणेमुळे आदिवासी कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. योजनेचे स्वरूप उत्तम आहे. दोन हजार रुपये नगदी बँक खात्यावर जमा करायचे आणि दोन हजार रुपयांचा किराणा भरुन द्यायचा, असं खावटी योजनेच स्वरुप आहे.

खावटी योजनेसाठी राज्यात शिक्षकांच्या मदतीने आदिवासी कुटुंबाचे सर्वेक्षण केले गेले. या सर्व प्रक्रियेला आता सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे.अजून आदिवासींच्या खात्यावर ना रक्कम जमा झाली आहे. ना किराणा मिळाला आहे. राज्यातील बारा लाख कुटुंब अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. (Tribal People facing problems due to not implementation of Khavati Scheme)

आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघातून स्थलांतर

अक्राणी मतदार संघाचे प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी प्रतिनिधित्व करतात. त्याच दोन तालुक्यातून हजारो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाली आहेत. जर आदिवासींना वेळेवर अनुदान मिळाले असते तर त्यांना स्थलांतराची वेळ आली नसती. मात्र, आता ही कुटुंब घर सोडून दुसऱ्या भागात गेल्यावर सरकार नेमके कुलूप लागलेल्या घरांना अनुदान देणार का हा प्रश्न आहे. अनेक कुटुंबाकडे ना रेशन कार्ड आहेत ना केवायसी केलेली बँक खाती आहेत. अशा स्थिती सरकारचे हे अनुदान मृगजळ तर ठरणार नाही ना अशी शंका आहे. (Tribal People facing problems due to not implementation of Khavati Scheme)

कोरोना काळामध्ये सामान्य माणसाला जगणे अवघड होत आहे. या परिस्थितीत आदिवासी समाज हा अधिक अडचणीत आहे. त्यांच्या समोरील अडचणी कमी करण्याऐवजी सरकार त्या वाढवण्याचं काम करते की काय ? असा प्रश्न खावटी अनुदानाबाबत निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या: 

सरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी 

(Tribal People facing problems due to not implementation of Khavati Scheme)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक