Maharashtra Breaking News LIVE 13 January 2025 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र आक्रमक झाला आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अशी आक्रमक मागणी केली जात आहे. त्यासोतच वाल्मिक कराडला मोक्का लावा, या मागणीसाठी आज मस्साजोगमध्ये आंदोलन केले जाणार आहे. आज 13 जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यांसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा
LIVE NEWS & UPDATES
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगली आहे. पृथ्वीराज चव्हाण तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. काँग्रेस वरिष्ठांकडून पृथ्वीराज यांच्या नावाला हिरवी कंदील दाखवल्याचं बोललं जात आहे. टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
-
बीड सरपंच हत्या प्रकरणी विष्णु चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
-
-
आपण जे काही सुरू करतो, त्याचे उद्घाटनही करतो – पंतप्रधान मोदी
सोनमर्गमध्ये पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की मोदीच सुरुवात करतात आणि उद्घाटनही करतात. प्रत्येक कामासाठी एक वेळ आहे आणि योग्य वेळी योग्य काम होणार आहे. आमच्या सरकारच्या काळात या बोगद्याचे काम पूर्ण झाले याचा मला आनंद आहे.
-
सीमाप्रश्नावर बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांना बोलावले
बांगलादेशचे उपउच्चायुक्त मोहम्मद नूरुल इस्लाम यांना सीमाप्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आहे. बांगलादेश सरकारकडून सहकार्य न मिळाल्याने त्याला समन्स बजावण्यात आले आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पर्यटनासाठी आढावा
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात महाबळेश्वरसह कोयना विभागातील शिवसागर जलाशयातील बॅक वॉटर परिसरातील पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. महाबळेश्वर सह पश्चिम भागात प्रामुख्याने ज्या समस्या सध्या पर्यटकांना उद्भवत आहे याबाबतचा आढावा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
-
-
टेंडरमध्ये तब्बल 690 कोटींचा घोटाळा
राज्याच्या युवक आणि क्रीडा विभागामार्फत काढण्यात आलेलं क्रीडा साहित्य खरेदीच टेंडर रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे. या टेंडरमध्ये तब्बल 690 कोटींचा घोटाळा दडलेला असल्याचा आरोप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी केला आहे.
-
तपास यंत्रणेचे हात बांधलेली आहे की काय- जरांगे
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु तपास यंत्रणेचे हात बांधलेली आहे की काय अशी शंका येत आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
-
वाल्मिक कराडला ३०२ का लावत नाही- मनोज जरांगे
तुम्हाला अजून मोबाईल सापडत नाही, त्यामध्ये खूप पुरावे असतील म्हणून तर तो मोबाईल फेकून दिला. वाल्मिक कराड खंडणीतला आरोपी आहे. तो मोदींपेक्षा मोठा लागला की काय. त्याला 302 मध्ये आरोपी करू शकत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
-
विष्णू चाटेला आज कोर्टात हजर करणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हत्या प्रकरणातील चौकशीसाठी चाटे दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपली. त्याची पुन्हा कोठडी मागण्यात येणार आहे.
-
धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
-
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी मिळाली आहे , धमकीचा व्हिडीओ हाकेंकडून शेअर करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकी मिळाल्याचा आरोप हाकेंनी केला आहे.
-
बीड: हत्येच्या एक महिना आधी संतोष देशमुखना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी
बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी त्यांना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी देण्यात आली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष देशमुख होते अस्वस्थ असा जबाबा पत्नी अश्विनी देशमुख यांनी cid कडे दिला आहे. देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात धमकी मिळाली होती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार भाजप महायुतीच्या आमदारांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून नौसेनेच्या दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत. मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
-
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आजपासून औषधपुरवठा बंद
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आजपासून औषधपुरवठा बंद, थकबाकी न मिळाल्याने वितरकांनी निर्णय घेतला आहे.
पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची १२० कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असून त्यामुळेच सर्व पुरवठादारांचा सोमवारपासून औषधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
४८ पुरवठादारांकडे १०० कोटी रुपयांची थकबाकी आणि २० कोटी रुपयांची नियमित थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. औषधपुरवठा बंद झाल्यास रुग्णांना बाहेरून चढ्या दराने औषधे खरेदी करावी लागतील.
-
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी तयार, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी तयार असून पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. संवेदनशील जिल्ह्याबाबत राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यादी तयार आहे. काल रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलावली
नाशिक- मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेल्या अपघात प्रकरणी ही तातडीची बैठक आहे. या अपघातात वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
-
नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पानिपतमध्ये
नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पानिपतमध्ये दाखल होणार आहेत. पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन असून पानिपत शौर्य स्मारक समितीमार्फत उद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्यासह माजी मंत्री रावसाहेब दानवेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पानिपत मधील काला आम स्मारकाजवळ उद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी 14 जानेवारीला पानिपतमध्ये शौर्य दिन साजरा होतो.
-
कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार रुपयांची मोठी घसरण
लासलगाव (नाशिक)- कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी बाजार भाव तेराशे रुपयांपर्यंत कोसळले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, अशा मागण्या कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
-
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली असून हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका
-
Maharashtra News: भ्रष्टाचाराला मोदी – शहांनी खतपाणी घातलं – संजय राऊत
भ्रष्टाचाराला मोदी – शहांनी खतपाणी घातलं… गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं… इंडिया आघाडी टिकायला हवी, काँग्रेसनं जबाबदारी घ्यायला हवी… पालिका स्वबळावर लढणार… लोकसभेत पुन्हा एकत्र येणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: मकरसंक्रांती निमित्त विठ्ठल मंदिरात स्वच्छतेला सुरुवात…
नवीन वर्षातील पहिला सण असल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल सभागृह,रुक्मिणी सभागृह तसेच मंदिराच्या इतर भागांची केली जात आहे स्वच्छता…. मकर संक्रांती निमित्त राज्यभरातून लाखो महिला भाविक येत असतात वाण वसा करण्यासाठी… पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे विठ्ठल मंदिराची स्वच्छता…
-
Maharashtra News: मुंबईत थंडीचा कडाका वाढला, प्रदूषातही मोठी वाढ
मुंबईत थंडीचा कडाका वाढला असून प्रदूषातही मोठी वाढ झाली आहे… शिवडी परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून मुंबईत होणाऱ्या विकासकामांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे…
-
Maharashtra News: ठाणे पालिकेवर आज धडकणार दिव्यांगांचं आंदोलन
ठाणे पालिकेवर आज धडकणार दिव्यांगांचं आंदोलन… बच्चू कडूंच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांगांचं आंदोलन…
-
Maharashtra News: पालघरमध्ये 500 रुपये बनवणारी बनावट नोटांचा कारखाना
पालघर मध्ये 500 रुपये बनवणारी बनावट नोटांचा कारखाना भायखळा पोलिसांनी केला पर्दाफाश… वाडा तालुक्यातील नेहाल पाडा येथे शेतात पत्र्याचा शेड बांधून सात महिन्यापासून सुरू होता बनावट नोटांचा कारखाना… निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची वितरण केल्याची तपासात प्राथमिक माहिती… भायखळा पोलिसांची पालघरच्या वाडा तालुक्यातील बनावट नोटांच्या कारखान्यावर मोठी कारवाई… बनावट नोटा छापण्याचे प्रिंटर, सहित अनेक साहित्य पोलिसांनी केलं जप्त… चार आरोपींना पोलिसांनी केली अटक, मोहरक्या फरार…
-
नवी मुंबईत आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे, अजित पवार हजेरी लावणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. नवी मुंबईतील खारघरमध्ये गेल्या १२ वर्षांपासून निर्माणाधीन असलेले इस्कॉन मंदिर अखेर पूर्णपणे तयार झाले आहे. भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव ‘श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर’ असे आहे. ९ एकरात पसरलेले हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
-
मनोज जरांगे पाटील आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार
मनोज जरांगे पाटील आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. आज देशमुख कुटुंबीयांनी टावर चढून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यातच जरांगे पाटील देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
-
मस्साजोगच्या ग्रामस्थांचे आज मोबाईल टॉवर चढून आंदोलन
बीड – आज मस्साजोगचे ग्रामस्थ करणार मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपीला मकोका लावण्यात यावा व हत्या प्रकरणात त्याचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी होणारआहेत. सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
-
पुण्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार; वडगावात ६१ गॅस टाक्या जप्त
पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैधरित्या सुरू असलेली विक्री सिंहगड रस्ता पोलिसाच्या पथकाने उघडकीस आणली. गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. विकास आकळे (३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकळे याच्यावर दोन महिन्यांपूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. पोलिस गस्तीवर होते. त्यादरम्यान वडगाव बुद्रूक भागात एकाने सिलिंडरचा साठा केला असून त्याची चोरून विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला
-
सारथी मार्फत तरुणांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण, मराठा-कुणबी समाजातील तरुणांना फायदा
पुणे : सारथीमार्फत सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत १ हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील तरुणांना याचा लाभ होणार आहे.
-
आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ, पहिलं शाही स्नान आज पार पडणार
आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस हा महाकुंभ मेळावा प्रयागराजमध्ये सुरु असणार आहे. या मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत.
Published On - Jan 13,2025 8:12 AM
