AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाकिस्तानवर हल्ला करताच आणखी एक मुस्लिम देश प्रचंड घाबरला; येऊ शकते उपासमारीची वेळ

IndiavsPakistan: भारत - पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण, आणखी एका मुस्लिम देशाला भरली धडकी, पूर्ण देशावर येऊ शकते उपासमारीची वेळ... संपूर्ण जगात भारत आणि पकिस्तानमधील तणावाची चर्चा

भारताने पाकिस्तानवर हल्ला करताच आणखी एक मुस्लिम देश प्रचंड घाबरला; येऊ शकते उपासमारीची वेळ
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: May 09, 2025 | 11:27 AM
Share

IndiavsPakistan: भारत आणि पाकिस्तानमधील वाढता संघर्ष आता केवळ सीमाप्रश्न राहिलेला नसून त्याचा परिणाम आशियाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे. तांदूळ, कांदा आणि अन्य आवश्यक वस्तू तणवग्रस्त वातावरणामुळे वादाच्या भोवऱ्यात येऊ शतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आणखी एका मुस्लिम देशाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन शत्रू राष्ट्रांमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे एका मुस्लिम देशाला धडकी भरली आहे. भारत आणि पकिस्तानमधील तणाव आणखी वाढल्यास संबंधित मुस्लिम देखील उपासमारीची देखील वेळ येऊ शकते.

सांगायचं झालं तर, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे, तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही देश एकत्रितपणे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये तांदूळ, कांदे आणि इतर अन्नपदार्थ पाठवतात. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमधील कोणत्याही प्रकारचे युद्ध किंवा संघर्ष या वस्तूंच्या पुरवठ्यावर आणि किमतींवर थेट परिणाम करू शकतो.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आणि पाकिस्तानने केलेल्या प्रत्युत्तरानंतर मलेशिया सर्वात जास्त चिंतेत आहे. मलेशियाचे अन्न सुरक्षा मंत्री मोहम्मद साबू यांनी साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर तणावाचा बंदरे किंवा वितरण पायाभूत सुविधांवर परिणाम झाला तर त्यांच्या देशाच्या तांदळाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर यांसारखे देखील तांदळासाठी भारत आणि पाकिस्तानवर आधारित आहे. मलेशिया त्याच्या एकूण तांदळाच्या वापराच्या फक्त 50 टक्के उत्पादन करतो, तर उर्वरित तांदळासाठी संबंधित देश भारत, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि थायलंड यांच्यावर अवलंबून आहेत. त्यांना 40 टक्के तांदूळ फक्त भारत आणि पाकिस्तानमधून येतो.

मलेशियाकडे सध्या 6 महिने पुरेल एवढा तांदळाचा साठा आहे. पण किंमती वाढल्यानंतर अडचणी वाढू शकतात. भारतातील स्वस्त तांदळाने जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे. जर तणाव वाढला तर किमती वाढू शकतात. मलेशिया आधीच देशांतर्गत तांदळाच्या संकटाचा सामना करत आहे. जर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला तर हे संकट अधिक गंभीर होऊ शकते.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....