AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor वेळी पाकिस्तानी वॉरशिप या देशाच्या सीमेजवळ जाऊन लपलेल्या, मोठ सत्य आलं समोर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्यावेळच एक मोठ सत्य समोर आलं आहे. एक असा फोटो समोर आलाय, जो याआधी कधी पाहिला नव्हता. हा फोटो म्हणजे पाकिस्तानच्या पराभवाचा, पळपुटेपणाचा स्पष्ट पुरावा आहे.

Operation Sindoor वेळी पाकिस्तानी वॉरशिप या देशाच्या सीमेजवळ जाऊन लपलेल्या, मोठ सत्य आलं समोर
Operation Sindoor
| Updated on: Aug 18, 2025 | 1:35 PM
Share

ऑपरेशन सिंदूरच्यावेळचा एक असा फोटो समोर आलाय, जो याआधी बाहेर आला नव्हता. हा फोटो पाकिस्तानी सैन्याचा पराभव आणि त्यांच्या मागे हटण्याचा पुरावा आहे. पहिल्यांदा समोर आलेल्या या फोटोवरुन संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पाकिस्तान कसे गुडघे टेकले ते दिसून येतं. ऑपरेशन सिंदूर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध लॉन्च केलं होतं. पण पाकिस्तानने त्याला आपलं युद्ध बनवलं. चार दिवस भारत-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला. 1971 च्या युद्धानंतर भारताने प्रथमच पाकिस्तानला पुढची काही वर्ष लक्षात राहिलं असा धडा शिकवला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली रणनिती आणि शक्तीचा परिचय दिला. याच कारणामुळे पाकिस्तानला मागे हटावं लागलं. अजूनपर्यंत काही गोष्टी गोपनीय होत्या. पण आता एक फोटो समोर आलाय. त्यावरुन भारताचा विजय आणि पाकिस्तानची कमजोरी स्पष्ट होते.

हा फोटो स्पष्ट पुरावा आहे की, पाकिस्तानी सैन्य आणि वॉरशिप संघर्षाच्या काळात मागे हटल्या. खासकरुन कराची बंदरात उभ्या असलेल्या युद्धनौकांचे फोटो पुरावा आहेत की, ते युद्ध लढण्याच्या स्थितीतमध्ये नव्हते. काही फोटोंमध्ये पाकिस्तानी युद्धनौकांनी इराणच्या सीमेजवळ शरण घेतल्याच दिसून आलय. हा त्यांच्या पराभवाचा स्पष्ट पुरावा आहे. फोटोंमध्ये स्पष्ट दिसतय की, युद्ध टिपेला पोहोचलेल असताना त्यावेळी पाकिस्तानी युद्धनौका इराणच्या सीमेजवळ जाऊन लपलेल्या. यातून त्यांची रणनितीक असमर्थता दिसून येते.

कुठल्या बंदरात आश्रय घेतलेला?

पाकिस्तानी युद्धनौकांनी इराणच्या सीमेजवळ आश्रय घेतलेला. कराचीपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वादर बंदरात पाकिस्तानच्या मुख्य युद्धनौका थांबल्या होत्या. भारतीय मिसाइलच्या रेंजमधून बचाव करण्यासाठी नाईलाजाने पाकिस्तानी नौदलाला हे पाऊल उचलावं लागलेल. ग्वादर हे पाकिस्तानी बंदर असून ते इराणच्या सीमेजवळ आहे. भारतीय मिसाइल्सच्या रेंजमधून वाचण्यासाठी पाकिस्तानी युद्धनौकांनी इराणी सीमेजवळ आश्रय घेतलेला.

भारतीय नौदलाने संयम दाखवला

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला पुढची अनेक वर्ष लक्षात राहिल असा धडा शिकवला आहे. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानी एअर फोर्सचे 11 बेस उडवले. म्हणजे धावपट्टीच उखडून टाकली. त्यांची क्षमता संपवली. त्याचवेळी पाकिस्तानने डागलेले ड्रोन्स आणि बॅलेस्टिक मिसाइल्स हवेतच नष्ट केले. हे युद्ध सुरु असताना भारतीय नौदलही अरबी समुद्रात सक्रीय होत. 9-10 मे च्या रात्री भारतीय नौदलाने संयम दाखवला. त्यांनी थोडी जरी ताकद दाखवली असती, तर पाकिस्तानच्या नाकीनऊ आले असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 100 दहशतवादी मारले. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच कुटुंब संपवलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.