AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसीचे 50 हजार कोटी बुडाले, संजय राऊत यांनी दिलं नेहरु, मनमोहन सिंग यांचं उदाहरण; भाजपला दाखवला आरसा

राष्ट्रहिताचा प्रश्न येतो. तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो. अशावेळी कोण कुणाचा मित्र आहे हे पाहात आहात. अशावेळी पंतप्रधानांनी तोंड उघडायला पाहिजे. या देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं.

एलआयसीचे 50 हजार कोटी बुडाले, संजय राऊत यांनी दिलं नेहरु, मनमोहन सिंग यांचं उदाहरण; भाजपला दाखवला आरसा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 10:26 AM
Share

नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कारभारावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप सरकारवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नेहरुंचा काळ असेल किंवा इंदिरा गांधींचा. किंवा मनमोहन सिंगाचा काळ असेल. या 67 वर्षात एलआयसीचं एक रुपयाचंही नुकसान झालं नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एलआयसीचे 50 हजार कोटींचे नुकसान झालं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधला.

अदानी विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे. एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन होत आहे. एलआयसीचं 50 हजार कोटीचं नुकसान झालं आहे. जिंदगी के पहले भी, जिंदगी के बाद भी एवढा एलआयसीवर विश्वास होता. गेल्या 67 वर्षात एलआयसीचं एक रुपयाचंही नुकसान झालं नव्हतं, असं संजय राऊत म्हणाले.

हा निर्लज्जपणा

हा नेहरुंचा काळ असेल. इंदिरा गांधींचा काळ असेल, लालबहादूर शास्त्री, व्हिपी सिंग, नरसिंह राव, मनमोहन सिंगांचा काळ असेल या 67 वर्षाच्या काळात एलआयसीचं एक रुपयांचंही नुकसान झालं नाही. ते आता गेल्या 7 वर्षात 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हा जनतेचा पैसा आहे. तो डुबलाय. तरीही सरकार म्हणतेय ऑल इज वेल. काही घडलं नाही. हा निर्लज्जपणा आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

आंदोलन करणार

मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये थोड्यावेळात आम्ही जमणार आहोत. अदानी प्रकरणावरून कोणती भूमिका घ्यायची हे ठरवणार आहोत. आम्ही संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहोत. अमृतकाळाताली हा महाघोटाळा आला आहे.

त्यावर आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कोणती भूमिका घ्यावी त्यावर निर्णय घेऊ. विरोधक जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो

अदानी हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचेही मित्र आहेत, असं विचारलं असता, राष्ट्रहिताचा प्रश्न येतो. तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो. अशावेळी कोण कुणाचा मित्र आहे हे पाहात आहात. अशावेळी पंतप्रधानांनी तोंड उघडायला पाहिजे. या देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं. तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करताय? असा सवाल राऊत यांनी केला.

आप क्यों चूप हो

या प्रकरणावर देशाच्या पंतप्रधानांनी, तपास यंत्रणांनी बोलायला हवं. त्यांच्याकडून अपेक्षा करा. विरोधी पक्ष म्हणून जी ताकद आहे. ती आम्ही लावत आहोत. पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. या संदर्भात कारवाई करायला तयार नाहीत. आप क्यों चूप हो, हा प्रश्न जनतेने पंतप्रधानांना विचारला पाहिजे. आप मन की बात क्यों नही बोलते, असं विचारायला हवं, असंही ते म्हणाले.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.