AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र आता भारतासाठी मोठी गुड न्यूज आहे. होर्मूज संकटात भारताच्या हाती मोठा जॅकपॉट लागला आहे.

होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट
अंदमानच्या समुद्रात सापडल्या नौसर्गिक वायूच्या विहीरीImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 10:17 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र अजूनही दोन्ही देशांमध्ये संघर्ष कायम आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झालं होतं. इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ला केला, आणि या युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ले करण्यात आले. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम घडवून आला. मात्र पूर्ण युद्धविराम घडवून आणण्यात पाकिस्तानला यश आलं नाही. त्यामुळे जरी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. आधून मधून दोन्ही देशांकडून हल्ले देखील सुरू आहेत.

दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद केलं होतं. त्यानंतर अमेरिकेनं देखील या भागात नाकेबंदी लावली. त्यामुळे मध्य पूर्वेतून भारताकडे येणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा साठा ठप्प झाला आहे. त्यामुळे सध्या भारताला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात मध्यंतरी एलपीजी गॅसची देखील टंचाई निर्माण झाली होती. तसेच कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यानं पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

मात्र त्यातच आता भारताच्या हाती एक मोठा जॅकपॉट लागला आहे, यामुळे भारामधील गॅस टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. हा जॅकपॉट म्हणजे अंदमानच्या समुद्रात नौसर्गिक वायूच्या विहीरी सापडल्या आहेत, याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी  यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी यासाठी इंडियन ऑइलचं अभिनंदन देखील केलं आहे. होर्मूज संकटात हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूच्या विहिरी सापडल्यामुळे गॅसचं संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

पाकिस्तानात आढळला कच्च्या तेलाचा साठा 

दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानमध्ये देखील कच्च्या तेलाचा एक मोठा साठा सापडला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हा कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे. गॅसचा देखील साठा आढळून आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला देखील दिलासा मिळणार आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात