AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Maldives deal : चीनचा जळफळाट होणार, भारतासाठी मालदीवने घेतला खास मोठा निर्णय

India-Maldives deal : मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे.

| Updated on: Aug 14, 2024 | 11:43 AM
Share
मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल.

मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल.

1 / 10
मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. "मालदीवच्या 28 बेटांवर पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला. नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो" असं मुइज्जू यांनी त्यांच्याा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. "मालदीवच्या 28 बेटांवर पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला. नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो" असं मुइज्जू यांनी त्यांच्याा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2 / 10
मालदीवमध्ये जवळपास 1190 बेटं आहेत. त्यात 200 बेटांवर लोक राहतात. 150 बेटांना पर्यटनासाठी विकसित करण्यात आलं आहे. आता 200 पैकी 28 बेटं भारताच्या ताब्यात येणार आहेत.

मालदीवमध्ये जवळपास 1190 बेटं आहेत. त्यात 200 बेटांवर लोक राहतात. 150 बेटांना पर्यटनासाठी विकसित करण्यात आलं आहे. आता 200 पैकी 28 बेटं भारताच्या ताब्यात येणार आहेत.

3 / 10
मालदीव आणि भारतामध्ये झालेला हा करार भारत विरोधकांना चांगलाच झोंबणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.

मालदीव आणि भारतामध्ये झालेला हा करार भारत विरोधकांना चांगलाच झोंबणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.

4 / 10
बांग्लादेशमध्ये भारत समर्थक सरकार कोसळल्यानंतर कुटनितीच्या दृष्टीने भारतासाठी ही एक चांगली बातमी आहे. फक्त पाणी आणि सीवरच्या साफसफाईसाठी मुइज्जू यांनी 28 बेटांची व्यवस्था भारताकडे का सोपवली ? असा प्रश्न पडू शकतो. मालदीवमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट्सना कचरा फेकण्यासाठी खूप कठोर नियम आहेत.

बांग्लादेशमध्ये भारत समर्थक सरकार कोसळल्यानंतर कुटनितीच्या दृष्टीने भारतासाठी ही एक चांगली बातमी आहे. फक्त पाणी आणि सीवरच्या साफसफाईसाठी मुइज्जू यांनी 28 बेटांची व्यवस्था भारताकडे का सोपवली ? असा प्रश्न पडू शकतो. मालदीवमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट्सना कचरा फेकण्यासाठी खूप कठोर नियम आहेत.

5 / 10
हॉटेल आणि रिसॉर्ट्सना कचरा वेगवेगळा करावा लागतो. घन कचरा थिलाफुशी बेटावर पाठवला जातो. कचरा योग्य पद्धतीने लेबल आणि पॅक करण्याची जबाबदारी हॉटेल आणि रिसॉर्ट्सची असते.

हॉटेल आणि रिसॉर्ट्सना कचरा वेगवेगळा करावा लागतो. घन कचरा थिलाफुशी बेटावर पाठवला जातो. कचरा योग्य पद्धतीने लेबल आणि पॅक करण्याची जबाबदारी हॉटेल आणि रिसॉर्ट्सची असते.

6 / 10
मालदीवमधील थिलाफुशी बेट ‘गारबेज आयलँड’ म्हणून ओळखलं जातं. कचरा फेकण्यासाठी या बेटाचा वापर होतो. हे बेट मालेपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. 1990 च्या दशकात कचरा फेकण्यासाठी लँडफिल म्हणून हे बेट विकसित करण्यात आलं.

मालदीवमधील थिलाफुशी बेट ‘गारबेज आयलँड’ म्हणून ओळखलं जातं. कचरा फेकण्यासाठी या बेटाचा वापर होतो. हे बेट मालेपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. 1990 च्या दशकात कचरा फेकण्यासाठी लँडफिल म्हणून हे बेट विकसित करण्यात आलं.

7 / 10
दुसऱ्या बेटांवरुन कचरा गोळा करुन थिलाफुशी बेटावर आणला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भारत मालदीवला टेक्नोलॉजी आणि आर्थिक मदत देतो.

दुसऱ्या बेटांवरुन कचरा गोळा करुन थिलाफुशी बेटावर आणला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भारत मालदीवला टेक्नोलॉजी आणि आर्थिक मदत देतो.

8 / 10
मालदीव छोटासा देश असला तरी हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख देश आहे. शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताच धोरण आहे. मालदीव भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे.

मालदीव छोटासा देश असला तरी हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख देश आहे. शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताच धोरण आहे. मालदीव भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे.

9 / 10
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यावर चीनच खूप बारीक लक्ष होतं. चीनला मालदीव बरोबर खूप खास संबंधांची, सहकार्याची अपेक्षा नाहीय असं ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. यातून चीनचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो. भारताचे मालदीव बरोबर संबंध बिघडवण्यात चीन अपयशी ठरला आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यावर चीनच खूप बारीक लक्ष होतं. चीनला मालदीव बरोबर खूप खास संबंधांची, सहकार्याची अपेक्षा नाहीय असं ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. यातून चीनचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो. भारताचे मालदीव बरोबर संबंध बिघडवण्यात चीन अपयशी ठरला आहे.

10 / 10
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.