AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Subodh bhave | सुबोध भावेने केले बालपणीच्या मैत्रीणीसोबत लग्न, लव्हस्टोरी ऐकून तुम्हाला ही वाटेल ‘प्यार हो तो ऐसा’

आज अभिनेता सुबोध भावे त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर सर्वांनीच त्याच्या अभियनक्षमतेला सलाम ठोकला.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 09, 2021 | 8:59 AM
Share
आज अभिनेता सुबोध भावे त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर त्याच्या अभिनयाचा सर्वांनाच अंदाज आला. पण केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटीक आहे. त्याची लव्हस्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीही सुबोधचे फॅन व्हाल.

आज अभिनेता सुबोध भावे त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर त्याच्या अभिनयाचा सर्वांनाच अंदाज आला. पण केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटीक आहे. त्याची लव्हस्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीही सुबोधचे फॅन व्हाल.

1 / 6
सुबोध आणि मंजिरीने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रेम कहाणीचा उलगडा केलाय. अगदी कमी वयातच दोघांचं नातं बहरलं होतं.सुबोधने पडद्यावर ज्याप्रमाणे खास भूमिका साकारल्या आहेत. तितकीत खास सुबोधची लव्ह स्टोरी आहे.नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये असताना सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली. मंजिरी त्यावेळी शाळेत शिकत होते. त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची आणि मंजिरीला पाहता क्षणीच सुबोध तिच्या प्रेमात पडला.

सुबोध आणि मंजिरीने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रेम कहाणीचा उलगडा केलाय. अगदी कमी वयातच दोघांचं नातं बहरलं होतं.सुबोधने पडद्यावर ज्याप्रमाणे खास भूमिका साकारल्या आहेत. तितकीत खास सुबोधची लव्ह स्टोरी आहे.नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये असताना सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली. मंजिरी त्यावेळी शाळेत शिकत होते. त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची आणि मंजिरीला पाहता क्षणीच सुबोध तिच्या प्रेमात पडला.

2 / 6
शाळेत असताना  सुबोधने मंदिरीला, शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून पत्र दिले. त्यावर सुबोधने उत्तर विचारल्यावर मंजिरीने जर मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर हो नाहीतर नाही असे सांगितले. त्यानंतर मंजिरी त्या पुलावर गेली आणि सुबोधला त्याच्या प्रेमाचे उत्तर मिळाले.

शाळेत असताना सुबोधने मंदिरीला, शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून पत्र दिले. त्यावर सुबोधने उत्तर विचारल्यावर मंजिरीने जर मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर हो नाहीतर नाही असे सांगितले. त्यानंतर मंजिरी त्या पुलावर गेली आणि सुबोधला त्याच्या प्रेमाचे उत्तर मिळाले.

3 / 6
 हळूहळू दोघांत मैत्री झाली. त्यानंतर 12वीला असताना मंजिरी कॅनडाला शिफ्ट झाली आणि तिची कमी भरून काढण्यासाठी सुबोधने स्वतःला नाटकात गुंतवून घेतले. परिवाराने त्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

हळूहळू दोघांत मैत्री झाली. त्यानंतर 12वीला असताना मंजिरी कॅनडाला शिफ्ट झाली आणि तिची कमी भरून काढण्यासाठी सुबोधने स्वतःला नाटकात गुंतवून घेतले. परिवाराने त्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

4 / 6
मंजिरी कॅनडाला गेल्यावर दोघेही एकमेकांना पत्रे लिहायचे. एक पत्र कॅनडाला पोहोचल्यावर त्या पत्राचे उत्तर येण्यासाठी 21 दिवसांचा अवधी लागायचा. अनेकदा तर सुबोधने लिहलेल्या पत्रांवरीलस पत्ता पावसाच्या पाण्याने पुसला गेल्याने ती पुन्हा त्यालाच भेटली होती.

मंजिरी कॅनडाला गेल्यावर दोघेही एकमेकांना पत्रे लिहायचे. एक पत्र कॅनडाला पोहोचल्यावर त्या पत्राचे उत्तर येण्यासाठी 21 दिवसांचा अवधी लागायचा. अनेकदा तर सुबोधने लिहलेल्या पत्रांवरीलस पत्ता पावसाच्या पाण्याने पुसला गेल्याने ती पुन्हा त्यालाच भेटली होती.

5 / 6
भारतात परतलेल्या मंजिरीने सुबोधसोबत पुण्यातील एका कंपनीत सोबत नोकरी केली. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. साखरपुडा झाला तेव्हा सुबोध नोकरी करत होता पण लग्न झाल्यानंतर नोकरीत मन रमेनासे झाले आणि सुबोधने नोकरी सोडून अभिनयाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला.  July 12, 2021 रोजी सुबोधने त्याच्या सोशल मीडियावर फोटो सोशल करत मंजिरीला शुभेच्छा दिल्या "लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… खूप काही न लिहिता 'तू तिथे मी' इतकंच" असं कॅप्शन त्याने दिले होते.

भारतात परतलेल्या मंजिरीने सुबोधसोबत पुण्यातील एका कंपनीत सोबत नोकरी केली. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. साखरपुडा झाला तेव्हा सुबोध नोकरी करत होता पण लग्न झाल्यानंतर नोकरीत मन रमेनासे झाले आणि सुबोधने नोकरी सोडून अभिनयाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. July 12, 2021 रोजी सुबोधने त्याच्या सोशल मीडियावर फोटो सोशल करत मंजिरीला शुभेच्छा दिल्या "लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… खूप काही न लिहिता 'तू तिथे मी' इतकंच" असं कॅप्शन त्याने दिले होते.

6 / 6
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....