AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात लिहिली गेली 33 वर्षे जुन्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वलची कथा, 4000 कैद्यांनी दिली आयडिया

बॉलिवूड अभिनेत्याने १९९३ च्या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. अभिनेत्याने सांगितले की, त्याला सीक्वलची कल्पना तुरुंगात असताना सुचली. त्याने ही कल्पना तुरुंगातील कैद्यांसोबत शेअर केली आणि सुमारे 4000 जण चित्रपट पाहण्यास तयार झाले.

| Updated on: Apr 27, 2026 | 12:22 PM
Share
चित्रपटसृष्टीत अनेकदा असे घडते की एखादी व्यक्तिरेखा इतकी लोकप्रिय होते की प्रेक्षक वर्षानुवर्षे त्याच्या सीक्वलची वाट पाहत असतात. बॉलिवूडमधील एक चित्रपट असा आहे ज्याची कथा ही तुरुंगात लिहिली गेली होती. ही कथा लिहिण्यासाठी तुरुंगातील कैद्यांनी मदत केली होती. आता हा चित्रपट कोणता आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल चला जाणून घेऊया...

चित्रपटसृष्टीत अनेकदा असे घडते की एखादी व्यक्तिरेखा इतकी लोकप्रिय होते की प्रेक्षक वर्षानुवर्षे त्याच्या सीक्वलची वाट पाहत असतात. बॉलिवूडमधील एक चित्रपट असा आहे ज्याची कथा ही तुरुंगात लिहिली गेली होती. ही कथा लिहिण्यासाठी तुरुंगातील कैद्यांनी मदत केली होती. आता हा चित्रपट कोणता आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल चला जाणून घेऊया...

1 / 5
'खलनायक' हा चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटातील 'बल्लू बलराम'च्या भूमिकेत संजय दत्तला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. म्हणूनच आजही या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होत असते. आता खुद्द संजय दत्तने 'खलनायक २' बाबत अपडेट देऊन चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. आता सुमारे ३३ वर्षांनंतर याच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. संजय दत्तने साकारलेला गँगस्टर 'बल्लू' आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते.

'खलनायक' हा चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटातील 'बल्लू बलराम'च्या भूमिकेत संजय दत्तला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. म्हणूनच आजही या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होत असते. आता खुद्द संजय दत्तने 'खलनायक २' बाबत अपडेट देऊन चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. आता सुमारे ३३ वर्षांनंतर याच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. संजय दत्तने साकारलेला गँगस्टर 'बल्लू' आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते.

2 / 5
संजय दत्तने सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानच त्याला अटक झाली होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांवेळी जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याने तिथे असलेल्या कैद्यांना विचारले की, "जर या चित्रपटाचा दुसरा भाग बनला, तर तो कोणाकोणाला पाहायला आवडेल?" यावर सुमारे ४००० कैद्यांनी होकार दिला. त्यानंतर संजय दत्तने त्या सर्वांना 'खलनायक २' ची कथा एकेका पानावर लिहिण्यास सांगितली. अशा प्रकारे त्याच्याकडे चित्रपटाच्या कथेचा ४००० पानांचा एक अनोखा संग्रह तयार झाला.

संजय दत्तने सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानच त्याला अटक झाली होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांवेळी जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याने तिथे असलेल्या कैद्यांना विचारले की, "जर या चित्रपटाचा दुसरा भाग बनला, तर तो कोणाकोणाला पाहायला आवडेल?" यावर सुमारे ४००० कैद्यांनी होकार दिला. त्यानंतर संजय दत्तने त्या सर्वांना 'खलनायक २' ची कथा एकेका पानावर लिहिण्यास सांगितली. अशा प्रकारे त्याच्याकडे चित्रपटाच्या कथेचा ४००० पानांचा एक अनोखा संग्रह तयार झाला.

3 / 5
अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याने ती सर्व पाने लक्षपूर्वक वाचली. जेव्हा तो पॅरोलवर बाहेर आला, तेव्हा त्याने सुभाष घई यांची भेट घेऊन ही संकल्पना त्यांच्याशी शेअर केली. ते पाहिल्यावर सुभाष घई म्हणाले, "हा चित्रपट बनवलाच पाहिजे." अशा प्रकारे 'खलनायक २' ची कल्पना तुरुंगातच तयार झाली, ज्यामध्ये हजारो कैद्यांचे योगदान होते.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याने ती सर्व पाने लक्षपूर्वक वाचली. जेव्हा तो पॅरोलवर बाहेर आला, तेव्हा त्याने सुभाष घई यांची भेट घेऊन ही संकल्पना त्यांच्याशी शेअर केली. ते पाहिल्यावर सुभाष घई म्हणाले, "हा चित्रपट बनवलाच पाहिजे." अशा प्रकारे 'खलनायक २' ची कल्पना तुरुंगातच तयार झाली, ज्यामध्ये हजारो कैद्यांचे योगदान होते.

4 / 5
'खलनायक' हा त्या काळातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाची कथा, संगीत आणि पात्रांनी प्रेक्षकांवर खोलवर परिणाम केला होता. विशेषतः 'नायक नहीं खलनायक हूं मैं' सारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला एक नवी ओळख मिळवून दिली होती.

'खलनायक' हा त्या काळातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाची कथा, संगीत आणि पात्रांनी प्रेक्षकांवर खोलवर परिणाम केला होता. विशेषतः 'नायक नहीं खलनायक हूं मैं' सारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला एक नवी ओळख मिळवून दिली होती.

5 / 5
Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली