AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरे ‘पापु’प्रेमी असाल तर नक्कीच वाचाल.. पाणीपुरी खाण्याचे फायदे आणि तोटे काय ?

Panipuri: जर आवडत्या स्ट्रीट फूडबद्दल बोलायचं झालं तर बहुतांश लोकांना आवडणारा आणि सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणज पापु, आपली पाणीपुरी हो..! गोलगप्पा, पुचका आणि अशा बऱ्याच नावांनी प्रसिद्ध असलेली पाणीपुरी ऑलमोस्ट सगळीकडेच मिळते. गोड आणि आंबट आणि तिखट पाणी, रगडा, शेव असं सगळं घातलेली पाणीपुरी खाल्ली की ब्रह्मानंदी टाळी लागते. पण पाणीपुरी खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच त्याचे अनेक तोटे देखील आहेत. तुम्हाला हे माहीत आहे का ? खरे 'पापु'प्रेमी असाल तर हे नक्की वाचा..

| Updated on: May 17, 2025 | 2:42 PM
Share
आजकाल रस्ते, मॉल, मार्केटपासून ते लग्न समारंभातही, सगळीकडे पाणीपुरी मिळते. बिस्लेरी पाण्याची पाणीपुरी वगैरेही असते की. पण रस्त्यावर सगळीकडेच मिळणारी पाणीपुरी स्वच्छ असेलच असं नाही. म्हणूनच पाणीपुरी अनेकदा आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

आजकाल रस्ते, मॉल, मार्केटपासून ते लग्न समारंभातही, सगळीकडे पाणीपुरी मिळते. बिस्लेरी पाण्याची पाणीपुरी वगैरेही असते की. पण रस्त्यावर सगळीकडेच मिळणारी पाणीपुरी स्वच्छ असेलच असं नाही. म्हणूनच पाणीपुरी अनेकदा आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

1 / 6
फायदे: तुम्हाला माहित असेलच की पाणीपुरीमध्ये धने, पुदिन्याची चटणी, चिंच किंवा कच्ची कैरी मिसळली जाते आणि हिंगाचा सौम्य सुगंध त्याची चव वाढवतं. फक्त हिंगच नाही तर चिंचेसारखे अनेक मसाले देखील असतात. हे सर्व पोट निरोगी ठेवते आणि लठ्ठपणा वाढण्यास प्रतिबंध करते. याशिवाय, मैद्याऐवजी रव्यापासून बनवलेली पाणीपुरी खाणे चांगलं ठरतं. कारण ते हलके असतं.

फायदे: तुम्हाला माहित असेलच की पाणीपुरीमध्ये धने, पुदिन्याची चटणी, चिंच किंवा कच्ची कैरी मिसळली जाते आणि हिंगाचा सौम्य सुगंध त्याची चव वाढवतं. फक्त हिंगच नाही तर चिंचेसारखे अनेक मसाले देखील असतात. हे सर्व पोट निरोगी ठेवते आणि लठ्ठपणा वाढण्यास प्रतिबंध करते. याशिवाय, मैद्याऐवजी रव्यापासून बनवलेली पाणीपुरी खाणे चांगलं ठरतं. कारण ते हलके असतं.

2 / 6
तोंडातील अल्सर : पाणीपुरीच्या पाण्यात जलजीरा, चिंच आणि पुदिना असतो. अशाप्रकारे, मसालेदार आणि आंबट पदार्थ खाल्ल्याने पोट स्वच्छ होते आणि अल्सरमधील पाणी बाहेर पडते, ज्यामुळे ते कोरडे होते. पण पाणीपुरीचे पाणी जास्त प्यायले आणि त्या पाण्यात रसायने असतील तर त्यामुळे फोड देखील येऊ शकतात. म्हणून ते अल्सरचे उपचार आणि कारण दोन्ही ठरू शकते.

तोंडातील अल्सर : पाणीपुरीच्या पाण्यात जलजीरा, चिंच आणि पुदिना असतो. अशाप्रकारे, मसालेदार आणि आंबट पदार्थ खाल्ल्याने पोट स्वच्छ होते आणि अल्सरमधील पाणी बाहेर पडते, ज्यामुळे ते कोरडे होते. पण पाणीपुरीचे पाणी जास्त प्यायले आणि त्या पाण्यात रसायने असतील तर त्यामुळे फोड देखील येऊ शकतात. म्हणून ते अल्सरचे उपचार आणि कारण दोन्ही ठरू शकते.

3 / 6
ॲसिडिटी बरी करते: बऱ्याचदा खूप प्रवास केल्यावर किंवा इतर कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटते आणि मळमळ होऊ लागते. अशा परिस्थितीत तीन किंवा चार पाणीपुरी खाल्ल्याने तोंडाची चव सुधारते आणि ॲसिडिटीपासूनही आराम मिळतो.

ॲसिडिटी बरी करते: बऱ्याचदा खूप प्रवास केल्यावर किंवा इतर कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटते आणि मळमळ होऊ लागते. अशा परिस्थितीत तीन किंवा चार पाणीपुरी खाल्ल्याने तोंडाची चव सुधारते आणि ॲसिडिटीपासूनही आराम मिळतो.

4 / 6
मूड सुधारतो: उन्हाळ्यात, अनेकदा मळमळ होते आणि आपल्याला काहीतरी थंड खावेसे किंवा प्यावेसे वाटते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पाणीपुरी खाल्ली आणि नंतर पाणी प्यायले तर तुमचा मूडही फ्रेश होतो. मग तुम्हाला तहानही कमी लागते.

मूड सुधारतो: उन्हाळ्यात, अनेकदा मळमळ होते आणि आपल्याला काहीतरी थंड खावेसे किंवा प्यावेसे वाटते. अशा परिस्थितीत जर तुम्ही पाणीपुरी खाल्ली आणि नंतर पाणी प्यायले तर तुमचा मूडही फ्रेश होतो. मग तुम्हाला तहानही कमी लागते.

5 / 6
पाणीपुरी खाण्याचे तोटे: अतिसार, डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब, अल्सर, पचनसंस्थेचा त्रास, सौम्य किंवा तीव्र पोटदुखी, आतड्यांमध्ये जळजळ, पाणीपुरी खूप जास्त खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रास देखील होतो. खरंतर, पाणीपुरीच्या पाण्यात भरपूर मीठ वापरले जाते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. दुसरे म्हणजे, पाणीपुरीच्या पुऱ्या तळण्यासाठी अनेकदा जे तेल वापरले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

पाणीपुरी खाण्याचे तोटे: अतिसार, डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब, अल्सर, पचनसंस्थेचा त्रास, सौम्य किंवा तीव्र पोटदुखी, आतड्यांमध्ये जळजळ, पाणीपुरी खूप जास्त खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रास देखील होतो. खरंतर, पाणीपुरीच्या पाण्यात भरपूर मीठ वापरले जाते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. दुसरे म्हणजे, पाणीपुरीच्या पुऱ्या तळण्यासाठी अनेकदा जे तेल वापरले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

6 / 6
Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....