यश यांच्या या अखेरच्या मेसेजमुळे संपूर्ण मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे.
1/7

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (terrorist attack) महाराष्ट्राच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथल्या यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं आहे.
2/7

यश हे अवघ्या 20 वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं.
3/7

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यश यांचा मित्राशी केलेला अखेरचा संवाद समोर आला आहे. यामध्ये 'आमचं काय आज आहे तर उद्या नाही' असं यश यांनी मित्राला म्हटलं आहे.
4/7

यश यांच्या या अखेरच्या मेसेजमुळे संपूर्ण मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे.
5/7

खरंतर, यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
6/7

यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
7/7

यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.