AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाण्यात होता चुकीचा शब्द, बदलताच ठरलं प्रचंड लोकप्रिय, मोडले सर्व रेकॉर्ड, आजही प्रत्येकाचं आवडतं

मनोज कुमार यांच्या या गाण्यात होती एक मोठी चूक, पण एक शब्द बदलताच गाणं ठरलं प्रचंड लोकप्रिय. 59 वर्षांपासून प्रत्येकाच्या ओठांवर असतं हे गाणं.

| Updated on: May 22, 2026 | 1:08 PM
Share
देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला की आजही सर्वप्रथम आठवण येते ती 'मेरे देश की धरती' या अजरामर गाण्याची. तब्बल 59 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वाजवलं जातं.

देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला की आजही सर्वप्रथम आठवण येते ती 'मेरे देश की धरती' या अजरामर गाण्याची. तब्बल 59 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वाजवलं जातं.

1 / 6
हे गाणं 'उपकार' या चित्रपटातील होतं. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेपासून प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. देशभक्ती, शेतकरी आणि सैनिकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

हे गाणं 'उपकार' या चित्रपटातील होतं. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेपासून प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. देशभक्ती, शेतकरी आणि सैनिकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

2 / 6
चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली होती. त्यामधील ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’ हे गाणं इतिहासात अजरामर ठरलं. या गीतामागे एक अतिशय रंजक किस्सा दडलेला आहे. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, गीतकार गुलशन बावरा यांनी हे गाणं लिहिलं होतं. मात्र सुरुवातीला या गाण्याची पहिली ओळ वेगळी होती.

चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली होती. त्यामधील ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’ हे गाणं इतिहासात अजरामर ठरलं. या गीतामागे एक अतिशय रंजक किस्सा दडलेला आहे. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, गीतकार गुलशन बावरा यांनी हे गाणं लिहिलं होतं. मात्र सुरुवातीला या गाण्याची पहिली ओळ वेगळी होती.

3 / 6
त्यांनी सुरुवातीला ‘इस देश की धरती सोना उगले’ अशी ओळ लिहिली होती. गाण्याच्या रिहर्सलदरम्यान मात्र कल्याणजी–आनंदजी यांना ‘इस’ हा शब्द सतत खटकत होता. गाण्याच्या धुनेसोबत तो शब्द योग्य प्रकारे जुळत नव्हता आणि अपेक्षित भावना निर्माण होत नव्हती.

त्यांनी सुरुवातीला ‘इस देश की धरती सोना उगले’ अशी ओळ लिहिली होती. गाण्याच्या रिहर्सलदरम्यान मात्र कल्याणजी–आनंदजी यांना ‘इस’ हा शब्द सतत खटकत होता. गाण्याच्या धुनेसोबत तो शब्द योग्य प्रकारे जुळत नव्हता आणि अपेक्षित भावना निर्माण होत नव्हती.

4 / 6
गाण्यावर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण समाधान मिळत नव्हतं. सुरुवातीला गीतकार गुलशन बावरा यांनाही या ओळीत काही त्रुटी वाटत नव्हती. मात्र कल्याणजी-आनंदजी यांना असं वाटत होतं की ‘इस देश’ म्हणताना आपल्या देशाशी असलेली आत्मीयता आणि जवळीक जाणवत नाही. गाण्यात ‘माझा देश’ अशी भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त व्हायला हवी होती.

गाण्यावर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण समाधान मिळत नव्हतं. सुरुवातीला गीतकार गुलशन बावरा यांनाही या ओळीत काही त्रुटी वाटत नव्हती. मात्र कल्याणजी-आनंदजी यांना असं वाटत होतं की ‘इस देश’ म्हणताना आपल्या देशाशी असलेली आत्मीयता आणि जवळीक जाणवत नाही. गाण्यात ‘माझा देश’ अशी भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त व्हायला हवी होती.

5 / 6
अखेर कल्याणजी-आनंदजी यांच्या मनात अचानक ‘मेरे देश’ हा शब्द आला आणि त्यांनी ‘इस’ ऐवजी ‘मेरे’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. हा बदल होताच गाण्याची संपूर्ण भावना बदलली आणि ती ओळ धुनेसोबत अगदी परफेक्ट बसली. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. हे गाणं देशभरात लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मनात कायमचं घर करून बसलं.

अखेर कल्याणजी-आनंदजी यांच्या मनात अचानक ‘मेरे देश’ हा शब्द आला आणि त्यांनी ‘इस’ ऐवजी ‘मेरे’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. हा बदल होताच गाण्याची संपूर्ण भावना बदलली आणि ती ओळ धुनेसोबत अगदी परफेक्ट बसली. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. हे गाणं देशभरात लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मनात कायमचं घर करून बसलं.

6 / 6
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा