AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: रब्बी पिकांनी शिवार बहरला, पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा

नांदेड : यंदा प्रथमच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक असताना यंदा हरभाऱ्याचा पेरा वाढला आहे. बदलती परस्थिती आणि पावसामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी हा बदल केला मात्र, पेरणीनंतर पीक उगवण होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. शिवाय मध्यंतरी वाढलेला गारठा यामुळे देखील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. पण आता वातावरण निवळले असून शेतकऱ्यांकडे मूबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने नांदेड जिल्हा शिवारात गहू, हरभरा, ज्वारी ही सगळीच पीके बहरू लागली आहे.

Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 07, 2022 | 9:51 AM
Share
हरभरा क्षेत्रात वाढ : पोषक वातावरणामुळे हरभरा पीक मोठ्या जोमात बहरलेले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण निवळताच शेतकऱ्यांनी फवारणी करुन पाणी दिल्याने आता हे पीकही बहरू लागले आहे. सध्याचे वातावरण हे पीक वाढीसाठी उत्तम आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही मुबलक प्रमाणात असल्याने चिंता नाही. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची ही संधी असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

हरभरा क्षेत्रात वाढ : पोषक वातावरणामुळे हरभरा पीक मोठ्या जोमात बहरलेले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण निवळताच शेतकऱ्यांनी फवारणी करुन पाणी दिल्याने आता हे पीकही बहरू लागले आहे. सध्याचे वातावरण हे पीक वाढीसाठी उत्तम आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही मुबलक प्रमाणात असल्याने चिंता नाही. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची ही संधी असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

1 / 5
नांदेड : नैसर्गिक संकटाची शर्यत पार करीत अखेर रब्बी हंगामातील पिके बहरली आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, ज्वारी ही पिके धोक्यात होती. यंदा वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. आता वातारवण पोषक असल्याने उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हंगामी पीक म्हणून कोथिंबरची लागवडही शेतकऱ्यांनी केली असून दर वाढीमुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

नांदेड : नैसर्गिक संकटाची शर्यत पार करीत अखेर रब्बी हंगामातील पिके बहरली आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, ज्वारी ही पिके धोक्यात होती. यंदा वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. आता वातारवण पोषक असल्याने उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हंगामी पीक म्हणून कोथिंबरची लागवडही शेतकऱ्यांनी केली असून दर वाढीमुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

2 / 5
 शेती मशागतीचे कामे जोमात : मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेती कामे करण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या वातावरण निवळले आहे. शिवाय सकाळी गारवा आणि दिवसभर ऊन यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत आहे. मोहरी क्षेत्रामध्ये यंदा प्रथमच वाढ झाली असून या कडधान्यातून उत्पादन पदरी पडेल असा आशावाद आहे.

शेती मशागतीचे कामे जोमात : मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेती कामे करण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या वातावरण निवळले आहे. शिवाय सकाळी गारवा आणि दिवसभर ऊन यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत आहे. मोहरी क्षेत्रामध्ये यंदा प्रथमच वाढ झाली असून या कडधान्यातून उत्पादन पदरी पडेल असा आशावाद आहे.

3 / 5
यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

4 / 5
रानभाज्या : रब्बी हंगामात केवळ उत्पादनावरच भर दिला जात नाही तर वातावरणामुळे रानभाज्याचे उत्पादनही घेतले जात आहे. विक्रीसाठी नाही पण किमान घरगुती वापरासाठी म्हणून शेतकरी याची लागवड करतात. मुख्य पिकांबरोबर रानभाज्यानेही शिवार बहरलेले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बी हंगामातच शिवार नंदनवन झाल्याचे चित्र आहे.

रानभाज्या : रब्बी हंगामात केवळ उत्पादनावरच भर दिला जात नाही तर वातावरणामुळे रानभाज्याचे उत्पादनही घेतले जात आहे. विक्रीसाठी नाही पण किमान घरगुती वापरासाठी म्हणून शेतकरी याची लागवड करतात. मुख्य पिकांबरोबर रानभाज्यानेही शिवार बहरलेले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बी हंगामातच शिवार नंदनवन झाल्याचे चित्र आहे.

5 / 5
Follow Us
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप