AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE 1st T20I: आयर्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह झाला भावुक, म्हणाला…

Jasprit Bumrah : आयर्लंड विरुद्धच्या पहिला टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पण डकवर्थ लुईस नियमानुसार कौल भारताच्या बाजूने लागला आणि विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यातील विजयासाठी जसप्रीत बुमराह याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

| Updated on: Aug 19, 2023 | 2:35 PM
Share
आयर्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी गेतली आहे. आयर्लंडने विजयासाठी दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना पावसाने हजेरी लावली. पण भारताच्या धावा आयर्लंडच्या तुलनेच जास्त असल्याने 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वातील हा पहिला विजय आहे.

आयर्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी गेतली आहे. आयर्लंडने विजयासाठी दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना पावसाने हजेरी लावली. पण भारताच्या धावा आयर्लंडच्या तुलनेच जास्त असल्याने 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वातील हा पहिला विजय आहे.

1 / 8
वर्षभराच्या कालावधीनंतर जसप्रीत बुमराह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. इतकंच काय आपल्या भेदक गोलंदाजीने आयर्लंडची दाणादाण उडवली. 4 षटकात 24 धावा देत 2 गडी बाद केले. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

वर्षभराच्या कालावधीनंतर जसप्रीत बुमराह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. इतकंच काय आपल्या भेदक गोलंदाजीने आयर्लंडची दाणादाण उडवली. 4 षटकात 24 धावा देत 2 गडी बाद केले. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

2 / 8
सामन्यानंतर जसप्रीत बुमराह याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. "मला आनंद वाटतो. मी एनसीएमध्ये बराच काळ सराव केला. तिथल्या सेशन्सना हजेरी लावली. त्यामुळे मला काही चुकत आहे असं वाटलं नाही. त्याचबरोबर नवीन काही करतोय असंही वाटत नाही. याचं सर्व श्रेय स्टाफला जातं. त्यांनी मला नव्याने उभारी दिली."

सामन्यानंतर जसप्रीत बुमराह याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. "मला आनंद वाटतो. मी एनसीएमध्ये बराच काळ सराव केला. तिथल्या सेशन्सना हजेरी लावली. त्यामुळे मला काही चुकत आहे असं वाटलं नाही. त्याचबरोबर नवीन काही करतोय असंही वाटत नाही. याचं सर्व श्रेय स्टाफला जातं. त्यांनी मला नव्याने उभारी दिली."

3 / 8
"माझं कमबॅक चांगलं झालं आहे. मी घाबरत नाही तर आनंदी आहे.", असं त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर जाहीरपणे सांगितलं.

"माझं कमबॅक चांगलं झालं आहे. मी घाबरत नाही तर आनंदी आहे.", असं त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर जाहीरपणे सांगितलं.

4 / 8
"सामना सुरु झाला तेव्हा चेंडू स्विंग होत होता. त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. सुदैवाने नाणेफेकीचा कौलही आमच्या बाजूने आला. वातावरणाची आम्हाली थोडीशी मदत झाली.", असं त्याने पुढे सांगितलं.

"सामना सुरु झाला तेव्हा चेंडू स्विंग होत होता. त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. सुदैवाने नाणेफेकीचा कौलही आमच्या बाजूने आला. वातावरणाची आम्हाली थोडीशी मदत झाली.", असं त्याने पुढे सांगितलं.

5 / 8
"आम्ही जिंकलो हे खरं आहे. पण काही ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास असून ते कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. आयपीएलमुळे आम्हाला खूप मदत झाली.", असंही जसप्रीत बुमराह याने सांगितलं.

"आम्ही जिंकलो हे खरं आहे. पण काही ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास असून ते कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. आयपीएलमुळे आम्हाला खूप मदत झाली.", असंही जसप्रीत बुमराह याने सांगितलं.

6 / 8
आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं. बॅरी मॅककार्थी याने नाबाद 51 आणि कर्टिस कॅम्पर याने 39 धावांची खेळी केली.

आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं. बॅरी मॅककार्थी याने नाबाद 51 आणि कर्टिस कॅम्पर याने 39 धावांची खेळी केली.

7 / 8
भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिषअमोई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर अर्शदीप सिंगच्या खात्यात एका विकेटची नोंद झाली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 6.5 षटकात 2 गडी गमवून 47 धावा केल्या होत्या. नेमका तेव्हाच पावसाने हजेरी लावली. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिषअमोई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर अर्शदीप सिंगच्या खात्यात एका विकेटची नोंद झाली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 6.5 षटकात 2 गडी गमवून 47 धावा केल्या होत्या. नेमका तेव्हाच पावसाने हजेरी लावली. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

8 / 8
Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!