AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : धोनीनंतर रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, दक्षिण अफ्रिकेत अशी कामगिरी करणारा दुसरा कर्णधार

केपटाऊनमध्ये रंगलेला दुसरा कसोटी सामना भारताने दुसऱ्या दिवशीच 7 गडी राखून जिंकला. दोन दिवसात 33 गडी बाद झाले. त्यामुळे आता खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुसरीकडे मालिका बरोबरी सोडवल्याने कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

| Updated on: Jan 04, 2024 | 5:41 PM
Share
भारताने दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. तर केपटाऊनमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. या विजयासह मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. पहिला मालिका गमवल्याने टीम इंडियावर दडपण आलं होतं.

भारताने दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. तर केपटाऊनमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. या विजयासह मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. पहिला मालिका गमवल्याने टीम इंडियावर दडपण आलं होतं.

1 / 6
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात कर्णधार रोहित शर्माला यश आलं आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी जिंकण्याचा दबाव होता. त्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात कर्णधार रोहित शर्माला यश आलं आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटी जिंकण्याचा दबाव होता. त्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

2 / 6
भारतीय संघ 1993 पासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र आजपर्यंत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, केपटाऊन कसोटी जिंकून टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अशी कामगिरी 13 वर्षांनंतर घडली आहे.

भारतीय संघ 1993 पासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. मात्र आजपर्यंत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, केपटाऊन कसोटी जिंकून टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अशी कामगिरी 13 वर्षांनंतर घडली आहे.

3 / 6
मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2010-2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे.

मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2010-2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार आहे.

4 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्याने टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मायदेशात भारत इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकल्याने टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मायदेशात भारत इंग्लंडशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

5 / 6
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार

6 / 6
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.