AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या संघांनी जिंकलीय? भारताच्या नावावर दोन, पण..

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी आठ संघ सज्ज झाले आहेत. हा मिनी वर्ल्डकप असल्याची क्रीडाप्रेमींचा धारणा आहे.. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होतील. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. आतापर्यंत या स्पर्धेचं जेतेपद कोणाला मिळालं आहे ते जाणून घेऊयात..

| Updated on: Jan 10, 2025 | 5:38 PM
Share
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998-99 मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेचं पहिलं जेतेपद दक्षिण अफ्रिकेने मिळवलं. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा 4 गडी राखून पराभव केला होता. वेस्ट इंडिजने विजयासाठी 245 धावांचं आव्हा दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून 47 षटकात पूर्ण केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998-99 मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेचं पहिलं जेतेपद दक्षिण अफ्रिकेने मिळवलं. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा 4 गडी राखून पराभव केला होता. वेस्ट इंडिजने विजयासाठी 245 धावांचं आव्हा दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून 47 षटकात पूर्ण केलं.

1 / 7
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा त्यानंतर 2000-2001 साली झाली. या स्पर्धेत न्यूझीलंडचं नशीब चमकलं. केनियात पार पडलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. भारताने 6 गडी गमवून 264 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने हे आव्हान 6 गडी आणि 2 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा त्यानंतर 2000-2001 साली झाली. या स्पर्धेत न्यूझीलंडचं नशीब चमकलं. केनियात पार पडलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. भारताने 6 गडी गमवून 264 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने हे आव्हान 6 गडी आणि 2 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं.

2 / 7
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2002-03 मध्ये श्रीलंकेत झाली. या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका हे संघ सामनेसामने आले होते. श्रीलंकेने 244 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसामुळे हा सामना काही झाला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सामना खेळला गेला. तेव्हा श्रीलंकेने 7 गडी गमवून 222 धावा केल्या. पठण या दिवशीही पावसामुळे सामना झाला नाही. त्यामुळे ही ट्रॉफी विभागून देण्यात आली.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2002-03 मध्ये श्रीलंकेत झाली. या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका हे संघ सामनेसामने आले होते. श्रीलंकेने 244 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसामुळे हा सामना काही झाला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सामना खेळला गेला. तेव्हा श्रीलंकेने 7 गडी गमवून 222 धावा केल्या. पठण या दिवशीही पावसामुळे सामना झाला नाही. त्यामुळे ही ट्रॉफी विभागून देण्यात आली.

3 / 7
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2004 साली पार पडली. या स्पर्धेवर वेस्ट इंडिजने नाव कोरलं. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने इंग्लंडला 2 गडी आणि 7 चेंडू राखून पराभूत केलं. इंग्लंडने 217 धावांचं आव्हान दिलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2004 साली पार पडली. या स्पर्धेवर वेस्ट इंडिजने नाव कोरलं. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने इंग्लंडला 2 गडी आणि 7 चेंडू राखून पराभूत केलं. इंग्लंडने 217 धावांचं आव्हान दिलं होतं.

4 / 7
ऑस्ट्रेलियाने 2006-07 आणि 2009-10 अशी दोन जेतेपदं सलग मिळवली. पहिल्यावेळी वेस्ट इंडिजला पराभूत केलं. दुसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडला पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियाने 2006-07 आणि 2009-10 अशी दोन जेतेपदं सलग मिळवली. पहिल्यावेळी वेस्ट इंडिजला पराभूत केलं. दुसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडला पराभूत केलं.

5 / 7
2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने नाव कोरलं. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चषक जिंकला. 20 षटकांचा हा सामना खेळवला गेला. हा सामना भारताने 5 धावांनी जिंकला.

2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने नाव कोरलं. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चषक जिंकला. 20 षटकांचा हा सामना खेळवला गेला. हा सामना भारताने 5 धावांनी जिंकला.

6 / 7
चॅम्पियन्स ट्रॉफीचं (2017) शेवटचं पर्व पाकिस्तानने आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताचा संपूर्ण संघ 158 धावांवर बाद झाला होता. पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला होता. (सर्व फोटो- ICC आणि Twitter)

चॅम्पियन्स ट्रॉफीचं (2017) शेवटचं पर्व पाकिस्तानने आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताचा संपूर्ण संघ 158 धावांवर बाद झाला होता. पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला होता. (सर्व फोटो- ICC आणि Twitter)

7 / 7
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.