AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदमांचा अनिल परबांवर हल्लाबोल, आता अनिल परब आणि शिवसेना नेत्यांची भूमिका काय?

अनिल परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केलाय. तसंच तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण? असा संतप्त सवालही कदम यांनी केलाय. कदम यांच्या या आरोपांवर आता स्वत: अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंद यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

रामदास कदमांचा अनिल परबांवर हल्लाबोल, आता अनिल परब आणि शिवसेना नेत्यांची भूमिका काय?
उदय सामंत, रामदास कदम, अनिल परब
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 4:31 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) प्रकरणानंतर शिवसेनेतून डावलले जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचीच खदखद आज रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडली. कदम यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अनिल परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केलाय. तसंच तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण? असा संतप्त सवालही कदम यांनी केलाय. कदम यांच्या या आरोपांवर आता स्वत: अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंद यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

अनिल परब काय म्हणाले?

रामदास कदम यांनी केलेले आरोप आणि टीकेबाबत पत्रकारांनी अनिल परब यांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, ‘मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही. मी शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल’. कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं परब यांनी टाळल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया

तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कदम यांनी परबांवर केलेल्या टीकेबाबत सावध प्रतिक्रिया दिली. ‘ज्या प्रकारे शिवसेनेनं त्याठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाली आहे. त्याचं नेतृत्व अनिल परब करत आहेत. आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत. त्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. पण रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी अनेकवेळा नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेवर माझ्यासारख्या शिवसैनिकानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही’, असं सामंत म्हणाले.

कदमाचं परबांना ओपन चॅलेंज!

वांद्रेमधून अनिल परब यांनी विधानसभेची किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असं खुलं आव्हान रामदासस कदमांनी दिलंय. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठलेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलाय. दोन वर्षात माझ्या मुलाचा त्यांनी एकदाही फोन घेतला नाही, असा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलाय. संजय कदमशी सातत्यानं अनिल परबांनी संबंध ठेवल्याचंही त्यांनी म्हटलंय. वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना नेहमी पाठीशी घालण्याचं काम अनिल परबांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, असं म्हणज रामदास कदमांनी पोस्टरही पत्रकार परिषदेत दाखवले. याबाबत आपण सुभाष देसाई आणि अनिल देसाईंनाही सांगितल्याची माहिती रामदास कदमांनी यावेळी दिली.

इतर बातम्या :

Amit Shah: सहकार क्षेत्रातील पक्षपात मूकदर्शक बनून पाहणार नाही; अमित शहांचा इशारा

नाताळ, नववर्ष स्वागताचे कार्यक्रम टाळा, मुंबई महापालिकेचं आवाहन; नव्या सूचना जारी

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.