AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण, कांदेंच्या आरोपांना शंभुराज देसाईंचाही दुजोरा

सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षतेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण, कांदेंच्या आरोपांना शंभुराज देसाईंचाही दुजोरा
शंभूराजे देसाईंची संजय राऊतांवर टीका
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 1:17 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जुन्या किस्स्याची आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीवीताला धोका असतानाही त्यांना (Uddhav Thackeray) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा नाकारली असा आरोप शिंदे गटाचे आ. सुहास कांदे यांनी केला होता. शिवाय त्यांनी केलेल्या आरोपाचे सतेज पाटील यांनी खंडन केले तर आता (Shambhuraj Desai) शंभुराज देसाईं यांनी मात्र दुजोरा दिला आहे. त्यादरम्यान नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आले होते. केवळ त्यांनाच नाहीतर त्यांच्या कुटुंबियांनाही धमकी देण्यात आली होती. असे असताना सुरक्षा देणे महत्वाचे होते. मात्र, याबाब वर्षावरुन विचारणा झाल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशी वागणूक दिली जात होती याचे दाखलेही त्यांच्या गटातील आमदारांनी देण्यास सुरवात केली आहे.

काय म्हणाले देसाई ?

सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षतेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली. यामध्येही त्यांना सुरक्षेची गरज पाहिजे असाच सूर उमटला होता. त्याअनुशंगाने अधिकऱ्यांशी बैठक पार पडत असताना सकाळी 8 ते साडे आठच्या दरम्यान आपणास वर्षा निवसस्थानावरुन फोन आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षतेबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांना सुरक्षतेची गरज नसल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका उद्देश काय आहे. हे माहित नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

नक्षलवाद्यांच्या धमकीचे पत्र

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री देखील होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्याला घेऊन काही निर्णय झाले होते. निर्णय होताच त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. एवढेच नाहीतर यामध्ये कुटुंबियांचाही समावेश असणार असा उल्लेख करण्यात आला होता. चौकशीअंती यामध्ये तथ्य असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जीवीताला धोका असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा का नाकारली हा प्रश्न कायम आहे.

सुहास कांदेचे काय आहेत आरोप?

आ. सुहास कांदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुन्हा राजकारण ढवळून निघत आहे. नक्षल्यांनी मारण्याची भूमिका दिला. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, सीआयडी असेल.. यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला रिपोर्ट केले. त्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदेंची सिक्युरिटी वाढवली नाही. हिंदुत्व विरोधकांना सिक्युरिटी दिली. पण हिंदुत्ववाद्यांना दिली नाही. हे का घडलं? शिंदेंना सिक्युरिटी द्यायची नाही. हिंदुत्ववाद्यांना अशी सुरक्षा का नाकारण्यात आली, असा माझा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.