AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार की युती आघाडी करून?; राज ठाकरे म्हणाले, हे सर्व पाहून…

जनता मोबाईलवर राग व्यक्त करून मोकळी झालेली असते. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत हे लोक वठणीवर येणार नाहीत, असंही ते म्हणाले.

लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार की युती आघाडी करून?; राज ठाकरे म्हणाले, हे सर्व पाहून...
Raj Thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2023 | 12:38 PM
Share

दापोली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनीही आज तीच भूमिका मांडली. सध्या राजकारणात जे काही सुरू आहे. त्यामुळे कुणाबरोबर मी जाईल हे मला वाटत नाही, असं सांगून राज ठाकरे यांनी कोणत्याही युती आणि आघाडीची शक्यता फेटाळली आहे. राज ठाकरे यांनी स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच लोकसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक असते. या निवडणुकीत एकच भूमिका असते. एका जिल्ह्यासाठी एक आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसरी असं काही नसतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काल ते चिपळूणला होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना संघटना बांधणीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. राज ठाकरे आज दापोलीत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना कुणाशीही युती किंवा आघाडी करणार नसल्याचं स्पष्टच सांगून टाकलं. तसेच येत्या 10 ते 15 दिवसात मी मेळावा घेणार आहे. यावेळी मी जे काय आहे ते स्पष्ट सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलतात? भाजप आणि राष्ट्रवादीच्या घरोब्यावर काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणुका होत नाही हे गंभीर

मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका होत नाहीत, त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य करत तीव्र संताप व्यक्त केला. कुणाच्या हातात काय राहिले? मला कळतच नाही. हम करे सो कायदा सुरू आहे. अजूनही निवडणुका होत नाहीत. दोन दोन-तीन तीन वर्ष निवडणुका प्रलंबित आहेत. हे गंभीर आहे. त्यावर कोणी बोलत नाही. चालढकल सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही

मोबाईल नावाचं माध्यम आलंय. पूर्वी लोक राग व्यक्त करायचे आणि रस्त्यावर उतरायचे. आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करत आहेत. त्या मोबाईलवरील प्रतिक्रिया राजकारणी पाहत नसतात. ते फक्त शांत जनता पाहतात. कारण जनता मोबाईलवर राग व्यक्त करून मोकळी झालेली असते. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत हे लोक वठणीवर येणार नाहीत, असंही ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येतात यात नवीन काय? असंही त्यांनी सांगितलं.

तरच पदावर राहतील

यावेळी त्यांनी मनसेची बांधणी कशी करणार याकडेही लक्ष वेधले. दर महिन्याला कार्यशाळा सुरू राहतील. कार्यक्रम कसे राबवले जातात, कोण किती काम करतंय हे पाहूनच ते लोक पदावर राहतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.