AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: भाग्यवान व्यक्तीकडेच ‘या’ असतात 3 गोष्टी, त्यांना जीवनात मिळतात सर्व सुख

Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये लिहिले आहे की, ज्या व्यक्तीकडे या तीन गोष्टी असतात, त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख मिळतात...आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरत आहे.

Chanakya Niti:  भाग्यवान व्यक्तीकडेच 'या' असतात 3 गोष्टी, त्यांना जीवनात मिळतात सर्व सुख
| Updated on: Feb 02, 2025 | 2:30 PM
Share

Chanakya Niti: प्रत्येकाला आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी एका गुरुची गरज असते. तर कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आणि कोणती वाईट याबद्दल ज्ञान असणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, आणि कूटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरत आहे. चाणक्य नीती चांगल्या प्रकारे समजून घेणारी कोणतीही व्यक्ती जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनते. व्यक्ती आनंदी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगते.

चाणक्य म्हणायचे की माणसाला यश आणि अपयश त्याच्या कर्मामुळे मिळते. माणसाचे कर्म चांगले असतील तर, तो सुख भोगतो आणि कर्म वाईट असतील तर, त्याच्या वाट्याला अनेक अडचणी येतात. चाणक्य नीतीमध्ये लिहिले आहे की, ज्या व्यक्तीकडे या तीन गोष्टी असतात, त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख मिळतात. ती व्यक्ती आयुष्यभर आनंदी राहते.

चांगल्या अन्नासह उत्तम आरोग्य | आचार्य चाणक्या यांनी सांगितल्यानुसार, ज्या व्यक्तीच्या नशिबात चांगलं जेवण आणि उत्तम आरोग्य असतं, ती व्यक्ती सर्व सुख अनुभवू शकते. त्याच्यापेक्षा श्रीमंत व्यक्ती कोणी नसू शकतो. कारण जो माणूस चांगलं अन्न खाऊ शकतो आणि अन्न सहज पचवू शकतो. अशा प्रकारचे जीवन माणसाला त्याच्या मागील जन्माच्या फळामुळेच मिळते.

सद्गुणी पत्नी | आचार्य चाणक्या सांगतात, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात सद्गुणी पत्नी असते. त्याच्यापेक्षा अधिक सुखी व्यक्ती पृथ्वीवर कोणी नाही. चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीला तिच्या मागील जन्मातील कर्मामुळेच सुंदर, सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री प्राप्त होते. तथापि, बर्याच वेळा असं होतं की, एखाद्या व्यक्तीला एक सुंदर स्त्री सापडते, परंतु एक चारित्र्यवान असेलच असं नसतं.

श्रीमंत व्यक्ती | आचार्य चाणक्य म्हणतात की या पृथ्वीवर जो श्रीमंत आहे तो आयुष्यभर सुखाचा उपभोग घेतो. माणूस श्रीमंत होणं हे त्याच्या मागील जन्माचं फळ आहे. दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. अशा स्थितीत या तीन गोष्टी असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीवरच स्वर्गसुख प्राप्त होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.