Chanakya Niti : या सवयी आत्मसात करा, घरात भरभराट होईल, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही

आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहीले. बुद्धिमत्ता आणि खोल समज यामुळे त्यांना कौटिल्य देखील म्हटले जाते. चाणक्य तक्षशिला येथे शिक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीति हा ग्रंथ अजूनही लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करते.

Chanakya Niti : या सवयी आत्मसात करा, घरात भरभराट होईल, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही
CHANAKYA-NITI
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 7:15 AM

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहीले. बुद्धिमत्ता आणि खोल समज यामुळे त्यांना कौटिल्य देखील म्हटले जाते. चाणक्य तक्षशिला येथे शिक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीति हा ग्रंथ अजूनही लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करते.

जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्या यांनी दिलेल्या धोरणांचे योग्य प्रकारे पालन केले तर त्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याला जीवनात यश मिळते. चाणक्यने आपले अनुभव आणि जीवनातील सर्व पैलूंबद्दल नीतिशास्त्रात लिहिले आहे. त्यांनी नीतिशास्त्रात अशा धोरणांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे घरात देवी लक्ष्मी निवास करते.

बुद्धीमान व्यक्तीचा आदर करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात ज्ञानाचा आदर केला जातो, तेथे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. योग्य व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करते ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळते. चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीकडून तुमची स्तुती ऐकण्याऐवजी, एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडून फटकार ऐकणे फायदेशीर आहे. एखाद्याने नेहमी बुद्धीमान व्यक्तींच्या सहवासात राहावे आणि त्यांचा आदर करावा.

अन्नाचा आदर

चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने अन्नाचा आदर केला पाहिजे. जर तुमच्या घरात अन्नाचा भांडार असेल तर ते व्यवस्थित ठेवले पाहिजे. अशा घरांमध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. चाणक्यांच्या मते, जे लोक अन्नाचा आदर करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीची कधीही कमतरता नसते. असे मानले जाते की जे लोक अन्नाचा आदर करत नाहीत त्यांच्यासोबत देवी लक्ष्मी कधीही राहत नाही.

पती-पत्नीमधील प्रेम

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात प्रेम आणि आनंद राहतो, तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. जिथे नात्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर आहे, तिथे आनंद आणि समृद्धी राहाते. ज्या घरात पती-पत्नीमध्ये भांडण होते तिथे गरिबीचे वास्तव्य असते. म्हणूनच घरातील सदस्यांचे एकमेकांवर प्रेम असले पाहिजे असे शास्त्रात सांगितले गेले आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | नात्यांची वीण घट्ट राहण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट कधीच विसरु नका!

Chanakya Niti : या 3 प्रकारच्या व्यक्तींची मदत कधीही करु नये, अन्यथा तुम्ही अडचणीत पडू शकता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.