भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिका अगदी रंगतदार स्थितीत आली आहे. भारत या मालिकेत अद्याप विजयी झाला नसला तरी भारताला मालिका पराभूत करणेही इंग्लंडला आता शक्य नाही. पाच कसोटी सामन्यांमध्ये चार सामन्यानंतर भारत 2-1 च्या आघाडीवर असल्याने अखेरचा सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. दुसरीकडे इंग्लंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत राहिल, तसेच सामना अनिर्णीत झाल्यासही भारतच मालिका जिंकेल. त्यामुळे भारतासाठी ही मालिका चांगली ठरली आहे. मात्र पाचव्या सामन्यात विजयच मिळवायचा असल्याने भारत संपूर्ण तयारी करत आहे. बीसीसीआयने देखील खेळाडूचे सराव करतानाचे फोटो शेअर केल आहेत.