AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : कॅप्टन हरमनप्रीत कौरमुळे टीम इंडिया अडचणीत! नक्की कशामुळे डोकेदुखी?

Shikha Pandey on Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत फलंदाज म्हणून काही खास करता आलेलं नाही. हरमनप्रीतला अपेक्षित वेगाने धावा करता आलेल्या नाहीत.

Team India : कॅप्टन हरमनप्रीत कौरमुळे टीम इंडिया अडचणीत! नक्की कशामुळे डोकेदुखी?
Harmanpreet Kaur Team IndiaImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Jun 24, 2026 | 9:06 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून (Icc Womens T20i World Cup 2026) आतापर्यंत 5 संघ बाहेर झाले आहेत. तर उपांत्य फेरीतील 4 जागांसाठी उर्वरित 7 संघांमध्ये चुरस आहे. वुमन्स टीम इंडियाला सलग तिसर सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं.  दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर विजय मिळवला. टीम इंडियाचा हा पहिला पराभव ठरला. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला चौथा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या कामगिरीवरुन माजी खेळाडू शिखा पांडे हीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हरमनप्रीतला या स्पर्धेत आतापर्यंत विस्फोटक बॅटिंग करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाला कुठेतरी त्याचा फटका बसतोय. नेमक्या याच मुद्द्यावरुन शिखा पांडे हीने भाष्य केलं आहे. हरमनप्रीतने विकेटचा विचार न करता आक्रमक खेळावं, असा सल्ला शिखाने भारतीय कर्णधाराला दिला आहे.

शिखा पांडे काय म्हणाली?

शिखाने हरमनप्रीतच्या बॅटिंगबाबत चिंता व्यक्त केली. हरमनप्रीतने तिच्या बॅटिंगच्या स्थानात बदल करायला हवं जेणेकरुन तिला सूर गवसेल, असं शिखाने म्हटलं. हरमनप्रीतने चौथ्या स्थानी बॅटिंगला यायला हवं. तर जेमिमाह रॉड्रिग्स पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी येऊ शकते, असं शिखा जिओहॉटस्टारच्या गेमप्लान या कार्यक्रमात म्हणाली.

“मधल्या फळीत खेळणाऱ्या हरमनप्रीत कौर हीचा स्ट्राईक रेट कमी असणं भारतासाठी चिंताजनक आहे. सुरुवातीलाच विकेट गेल्यास यास्तिका भाटीया बॅटिंगसाठी येते. तसेच जेमिमाह पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी येते. हरमनप्रीतची कामगिरी कशीही असो तिने विकेट गमावण्याबाबत विचार करु नये. हरमनप्रीतला आक्रमकपणे खेळायला हवं. हरमनप्रीतला एकदा का सूर गवसला की ती सहज मोठे फटके मारेल”, असा सल्ला देत शिखाने हरमनप्रीतबाबत विश्वास व्यक्त केला.

हरमनप्रीत कौर हीची आकडेवारी

दरम्यान हरमनप्रीतने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 3 सामन्यांमध्ये 72 धावा केल्या आहेत. हरमनप्रीतने 24 च्या सरासरीने आणि 109.09 च्या स्ट्राईक रेटने ही कामगिरी केली. त्यामुळे आता हरमनप्रीत चौथ्या क्रिकेट सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत