AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England Semi Final: उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. भारताचा सामना इंग्लंडशी होणार असून ही लढत वाटते तितकी सोपी नाही. असं असताना या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची उत्सुकता आहे.

India vs England Semi Final: उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?
उपांत्य फेरीपूर्वी या चार खेळाडूंना बेंचवर बसवण्याचा निर्णय! अभिषेक शर्माचं काय?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 05, 2026 | 4:11 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका बाजूने न्यूझीलंडने धडक मारली आहे. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ भारत इंग्लंड सामन्यातून ठरणार आहे. भारत इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडचं आव्हान टीम इंडियासाठी वाटतं तितकं सोपं नाही. भारत या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरेल याचीही उत्सुकता लागून आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धचं आव्हान मोडून काढण्यासाठी भारतीय संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्य टीम इंडिया कोणताही बदल करणार नाही. म्हणजेच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला संघच यावेळी मैदानात उतरणार आहे. अभिषेक शर्मा खराब फॉर्मात असूनही त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे निश्चित आहे. तर उपांत्य फेरीचा सामना कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकु सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बेंचवर बसून पाहावं लागेल.

ओपनिंग कोण करणार?

टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये बदल करणार नाही हे तर निश्चित आहे. पण ओपनिंग जोडी बदलेल का? असा प्रश्न आहे. कारण अभिषेक शर्माची बॅट काही या स्पर्धेत चालली नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकविरूद्ध 15 धावांची खेळी केली. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर सूर गवसल्याची चर्चा झाली. पण वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा एकदा 10 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला काही लय नाही असंच क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माची कामगिरी चांगली राहिली आहे. याच स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तसेच यात मैदानावर इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यामुळे आता ओपनिंगला कोण येणार? याची उत्सुकता आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....