AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद! माजी क्रिकेटपटूने धडाधड सर्व गोष्टी सांगून टाकल्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने गौतम गंभीरच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे भारतीय संघात बरंच काही घडत असल्याचं दिसत आहे.

गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद! माजी क्रिकेटपटूने धडाधड सर्व गोष्टी सांगून टाकल्या
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद! माजी क्रिकेटपटूने धडाधड सर्व गोष्टी सांगून टाकल्याImage Credit source: PTI
| Updated on: Jul 15, 2026 | 6:28 PM
Share

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने संघाची धुरा हाती घेतल्यापासून रडारवर आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गेल्या 2 वर्षांपासून संघाचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवत आहे. या कालावधीत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी20 वर्ल्डकप 2026 जिंकला. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. तर वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या तयारीतही उणीवा दिसून येत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्या दोन वर्षांच्या कालावधीला 10 पैकी 4 गुण दिले आहेत. मोहम्मद कैफने सांगितलं की, गंभीरमध्ये खेळाडूंशी संवाद साधण्याची कला नाही. मोहम्मद कैफने अप्रत्यक्षरित्या गंभीर आणि खेळाडूंमध्ये पारदर्शकता नसल्याचं सांगून गेला. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात संवाद होत नसल्याचंही कैफ बोलून गेला. कैफने गंभीर सल्ला देत सांगितलं की, खेळाडूंशी त्यांच्या रूममध्ये जाऊन बोलायला हवं.

काय म्हणाला मोहम्मद कैफ?

मोहम्मद कैफ म्हणाला की, ‘मी गंभीरला 10 पैकी 4 गुण देईन. मी काही गुण कमी करेन. मला नुकतेच कळले आहे की विराट कोहली आणि गौतम गंभीर एकत्र दिसत नाहीत. गंभीर रोहित आणि गिलसोबत दिसतो, पण तो विराटसोबत दिसत नाही. ही एक उणीव आहे. जर एखाद्या खेळाडूला संघातून वगळले असेल, तो त्याच्या कामगिरीवर समाधानी नसेल, किंवा त्याला योग्य वागणूक मिळाली नसेल, तर पारदर्शकता राखणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. खेळाडूंशी बोला. त्यांना का वगळण्यात आले हे समजावून सांगा.’

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, ‘जय-पराजय मैदानावरच ठरेल. खेळाडूंना वगळण्याचे कारण स्पष्ट केले पाहिजे. जर गंभीर आणि विराट सध्या एकत्र काम करत नसतील, तर ही चांगली बातमी नाही. जर ते एकत्र नसतील, तर ही भारतासाठी चांगली बातमी नाही. दक्षिण आफ्रिकेत 2027चा विश्वचषक जिंकणे सोपे नसेल. तुम्हाला सर्व खेळाडूंना एकत्र ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला वरिष्ठांशी समन्वय साधावा लागेल. मित्रा, खोलीत जाऊन बोल. हेच प्रशिक्षकाचे काम आहे.’

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी सराव शिबिरात गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सरावादरम्यान गंभीरने रोहित, गिल आणि केएल राहुलशी संवाद साधला. पण विराट कोहलीशी बोलला नाही. त्यामुळे संघात काही तरी घडतंय अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक