AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: टीम इंडियाच्या खेळाडूंचा 4 तास खोळंबा, ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी उशीर का? झालं असं की..

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आणि 16 ऑक्टोबरला सकाळी जवळपास 4 वाजता पोहोचला. पण पर्थला पोहोचण्यासाठी 4 तास उशीर झाला. असं का झालं त्याचं कारण आता समोर आलं आहे.

IND vs AUS: टीम इंडियाच्या खेळाडूंचा 4 तास खोळंबा, ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी उशीर का? झालं असं की..
IND vs AUS: टीम इंडियाच्या खेळाडूंचा 4 तास खोळंबा, ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी उशीर का? झालं असं की..Image Credit source: (Photo-Screenshot/X)
| Updated on: Oct 16, 2025 | 5:59 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील. 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ 15 ऑक्टोबरला दिल्ली विमानतळावरून रवाना झाला होता. पण ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी टीम इंडियाला 4 तास उशीर झाला. त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर मानसिक थकवा स्पष्ट दिसत होता. पण उशीर होण्याचं कारण काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचं विमानाने दिल्ली एअरपोर्टवरून चार उशिराने भरारी घेतली. त्यामुळे सिंगापूरच्या उड्डाणाची वेळही बदलावी लागली. खरं तर टीम इंडियाचे खेळाडू रात्री 12 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. पण 16 ऑक्टोबरला सकाळी 4 वाजता पर्थला पोहोचले.

दिल्लीहून पर्थला टीम इंडियाची पहिली बॅच रवाना झाली. या बॅटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल,केएल राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, हार्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू होते. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचं विमान पर्थमध्ये उतरताच कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढलं आणि हॉटेलच्या बसमध्ये बसवलं. या दरम्यान, काही भारतीय चाहते खेळाडूंची वाट पाहात होते. दुसरीकडे, या प्रवासातील थकवा खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 16 ऑक्टोबरचा दिवस हा आराम करण्यात जाणार आहे. खरं तर पहिल्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला तयारीसाठी फक्त दोन दिवस आहेत.

पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. रिपोर्टनुसार, या सामन्यापूर्वी 17 आणि 18 ऑक्टोबरला भारतीय खेळाडू सराव शिबिरात भाग घेतली. या दोन दिवसात भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी जुळवून घ्यायचं आहे. दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोबर आणि तिसरा वनडे सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या वनडे मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपास सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.