AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडिया महामुकाबल्यासाठी सज्ज, पाकिस्तानचा हिशोब करण्याची संधी

India vs Pakistan U19 Asia Cup 2025 : पाकिस्तानने टीम इंडियाला आजपासून वर्षाआधी पराभूत केलं होतं. अंडर 19 टीम इंडियाला धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावं लागलं होतं. आता टीम इंडियाला त्याच पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे.

IND vs PAK : टीम इंडिया महामुकाबल्यासाठी सज्ज, पाकिस्तानचा हिशोब करण्याची संधी
India vs Pakistan U19 Asia Cup 2025Image Credit source: ACC
| Updated on: Dec 13, 2025 | 9:51 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानबाबत प्रचंड चीड आणि तीव्र संताप होता. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबतचे जवळपास सर्वच व्यवहार बंद केले होते. मात्र याला एक अपवाद होता तो म्हणजे क्रिकेट सामना. या अशा घटनेनंतर मेन्स टी 20I आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला अनेक राजकीय पक्षांसह संघटनांनीही तीव्र विरोध केला. मात्र त्यानंतरही भारत-पाक (India vs Pakistan) सामना झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक वयोगटातील स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामने झाले आहेत. आता रविवारी 14 डिसेंबरला पुन्हा एकदा हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेचा थरार

सध्या दुबईत अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेचं (U19 Asia Cup 2025) आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेनिमित्ताने भारत-पाक दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. तसेच टीम इंडियासाठी हा सामना फार प्रतिष्ठेचा असणार आहे.

अंडर 19 टीम इंडिया 5 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?

टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध गेल्या अर्ध्या दशकापासून विजयाची प्रतिक्षा कायम आहे. अंडर 19 टीम इंडियाला गेल्या 5 वर्षांत पाकिस्तान विरुद्ध एकदाही विजयी होता आलेलं नाही. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा अखेरचा सामना हा 2020 साली जिंकला होता. तेव्हापासून टीम इंडियाची प्रतिक्षा कायम आहे. तर पाकिस्तानने 2020 नंतर टीम इंडिया विरुद्ध सलग 3 सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाकडे परतफेडीची संधी

अंडर 19 इंडिया आणि पाकिस्तान संघ याआधी वर्षभराआधी नोव्हेंबर 2024 मध्ये आमनेसामने आले होते. तेव्हा पाकिस्तानने टीम इंडियावर 43 धावांनी मात केली होती. आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ही स्टार जोडी त्या सामन्यात होती. या दोघांना त्या सामन्यात काही विशेष करता आलं नव्हतं. त्यामुळे वैभव आणि आयुष या स्टार जोडीचा पाकिस्तान विरुद्ध चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

सलग दुसरा सामना कोण मिळवणार?

तसेच दोन्ही संघांचा हा या अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये सलग दुसरा सामना जिंकण्याची चुरस असणार आहे.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत