AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Know This | अच्छा!… म्हणून मीठ टाकल्यावर रक्त शोषणारा जळू लगेच मरतो होय!

रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा?

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 5:22 PM
Share
जळू तुम्हा सगळ्यांना माहीत आहेच. रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा, यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊयात या मागचा साईन्टिफ एन्गल...

जळू तुम्हा सगळ्यांना माहीत आहेच. रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा, यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊयात या मागचा साईन्टिफ एन्गल...

1 / 5
जळू नावानं परिचित असलेला का किडा खरंतर वेगळ्याच नावानं मेडिकल फिल्डमध्ये ओळखला जातो. जळूचं वैज्ञानिक नाव आहे हिरुडो मेडिसिनेलिस! उच्चारायला आणि पचनी पडायला थोडं कठीण जरी असली तरी वेगवेगळ्या मेडिकल फिल्डमध्ये जळूचा उपयोग केला जातो. दलदलीसारख्या ठिकाणी हमखास जळू आढळतात. रक्त हा जळूचा मुख्य आहार आहे. म्हणूनच तो माणसाच्या किंवा कोणत्याही जनावराच्या शरीराला चिकटतो आणि शरीरातील रक्त शोषून घेतो.

जळू नावानं परिचित असलेला का किडा खरंतर वेगळ्याच नावानं मेडिकल फिल्डमध्ये ओळखला जातो. जळूचं वैज्ञानिक नाव आहे हिरुडो मेडिसिनेलिस! उच्चारायला आणि पचनी पडायला थोडं कठीण जरी असली तरी वेगवेगळ्या मेडिकल फिल्डमध्ये जळूचा उपयोग केला जातो. दलदलीसारख्या ठिकाणी हमखास जळू आढळतात. रक्त हा जळूचा मुख्य आहार आहे. म्हणूनच तो माणसाच्या किंवा कोणत्याही जनावराच्या शरीराला चिकटतो आणि शरीरातील रक्त शोषून घेतो.

2 / 5
शरीरावर जळू चिकटला की त्याला हटवायचं कसं? असा प्रश्न आता कुणाला पडत नाही. कारण सगळ्यांनाच त्यावरचा जालीम उपाय हा कळलाय. साध्या मिठामुळे जळू लगेच मरुन जातो. त्यामुळे त्वचेवर चिकटून बसलेल्या जळूला मारण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. पण मीठच का जळूला मारण्यासाठी वापरतात? हे अनेकांना ठाऊक नाही. त्यामागे आहे एक खास कारण. जळूसारखा चिपचिपीत, ओला कीडा हा नाजूक त्वचेचा बनलेला असतो. एका रासायनिक प्रक्रियेमुळे मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतं. मुळात मिठाचा गुणधर्म हा पाणी शोषून घेण्याचा आहेच, हे आपण विज्ञानात शिकलो आहोत. गाढवाची गोष्ट तुम्हाला शाळेत कुणीतरी सांगितलेली आठवत असेलच की! तर या गुणधर्माप्रमाणेच मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतं.

शरीरावर जळू चिकटला की त्याला हटवायचं कसं? असा प्रश्न आता कुणाला पडत नाही. कारण सगळ्यांनाच त्यावरचा जालीम उपाय हा कळलाय. साध्या मिठामुळे जळू लगेच मरुन जातो. त्यामुळे त्वचेवर चिकटून बसलेल्या जळूला मारण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. पण मीठच का जळूला मारण्यासाठी वापरतात? हे अनेकांना ठाऊक नाही. त्यामागे आहे एक खास कारण. जळूसारखा चिपचिपीत, ओला कीडा हा नाजूक त्वचेचा बनलेला असतो. एका रासायनिक प्रक्रियेमुळे मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतं. मुळात मिठाचा गुणधर्म हा पाणी शोषून घेण्याचा आहेच, हे आपण विज्ञानात शिकलो आहोत. गाढवाची गोष्ट तुम्हाला शाळेत कुणीतरी सांगितलेली आठवत असेलच की! तर या गुणधर्माप्रमाणेच मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतं.

3 / 5
शरीरात पाणी असणं, हे जळूसाठी सुद्धा आणि माणसासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी-जास्त झालं, की मग अडचणी सुरु होतात. जळूच्या बाबतीचही हेच घडलं. शरीरातून पाणी कमी झाल्यानं जळू कमकुवत होतो. त्याच्या शरीरातील पेशी काम करणं बंद करतात. त्यामुळे मीठ टाकल्यानंतर जळू हा तडफडून मरतो! म्हणूनच जळू शरीरावर चिकटल्यानंतर मीठ टाकण्याचा सल्ला दिला जातो.

शरीरात पाणी असणं, हे जळूसाठी सुद्धा आणि माणसासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी-जास्त झालं, की मग अडचणी सुरु होतात. जळूच्या बाबतीचही हेच घडलं. शरीरातून पाणी कमी झाल्यानं जळू कमकुवत होतो. त्याच्या शरीरातील पेशी काम करणं बंद करतात. त्यामुळे मीठ टाकल्यानंतर जळू हा तडफडून मरतो! म्हणूनच जळू शरीरावर चिकटल्यानंतर मीठ टाकण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5
आयुर्वेदातही जळूचं महत्त्व मोठं आहे. शरीरातील मेलेल्या पेशी किंवा अशुद्ध रक्त जळू शोषून घेतो. त्यामुळे अनेकदा यासाठी जळूचा वापर उपचार देताना आर्युवेदात केला जातो. मात्र या उपचारादरम्यान अनेकदा जखमांचे निशाणही बनतात. त्यावर हलकी मलमपट्टी केली, की त्या निघूनही जातात. म्हणूनच मेलेल्या पेशींना पुनरुज्जीवित करण्यासाठीही जळूची मदत घेतली जाते. उपचार झाल्यानंतर जळूला हटवण्यासाठी पुन्हा मिठाचा वापर करतात, तो त्याला मारण्यासाठीच!

आयुर्वेदातही जळूचं महत्त्व मोठं आहे. शरीरातील मेलेल्या पेशी किंवा अशुद्ध रक्त जळू शोषून घेतो. त्यामुळे अनेकदा यासाठी जळूचा वापर उपचार देताना आर्युवेदात केला जातो. मात्र या उपचारादरम्यान अनेकदा जखमांचे निशाणही बनतात. त्यावर हलकी मलमपट्टी केली, की त्या निघूनही जातात. म्हणूनच मेलेल्या पेशींना पुनरुज्जीवित करण्यासाठीही जळूची मदत घेतली जाते. उपचार झाल्यानंतर जळूला हटवण्यासाठी पुन्हा मिठाचा वापर करतात, तो त्याला मारण्यासाठीच!

5 / 5
Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.