AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान सामना होणार, तब्बल इतक्या कोटींचं नुकसान टळलं

India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असते. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15 फेब्रुवारीला नियोजित सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता आठवड्यात पाकिस्तानने सामना खेळणार असल्याचं जाहीर केलंय.

| Updated on: Feb 10, 2026 | 4:37 PM
Share
पाकिस्तानने नेहमीप्रमाणे यु-टर्न घेत जगासमोर आपली लाज घालवून घेतलीय. पाकिस्तानने 9 फेब्रुवारीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आयसीसीचं कित्येक हजारो कोटी रुपयांचं नुकसान टळलंय. आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यात लाहोरमध्ये बैठक झाली. पाकिस्तानने या बैठकीत खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानने आधी 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. (Photo Credit : Getty/PTI)

पाकिस्तानने नेहमीप्रमाणे यु-टर्न घेत जगासमोर आपली लाज घालवून घेतलीय. पाकिस्तानने 9 फेब्रुवारीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आयसीसीचं कित्येक हजारो कोटी रुपयांचं नुकसान टळलंय. आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यात लाहोरमध्ये बैठक झाली. पाकिस्तानने या बैठकीत खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानने आधी 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. (Photo Credit : Getty/PTI)

1 / 5
आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे 9 फेब्रुवारीला रात्री उशिराने पाकिस्तान टीम इंडिया विरुद्ध खेळणार असल्याचं  जाहीर केलं. अशात आता भारत-कोलंबो विमान प्रवासाच्या तिकीटांच्या दरात  तब्बल चौपट वाढ झाली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई ते कोलंबो विमान प्रवासाच्या तिकीटाच्या दरात 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता 60 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. (Photo Credit : Getty/PTI)

आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे 9 फेब्रुवारीला रात्री उशिराने पाकिस्तान टीम इंडिया विरुद्ध खेळणार असल्याचं जाहीर केलं. अशात आता भारत-कोलंबो विमान प्रवासाच्या तिकीटांच्या दरात तब्बल चौपट वाढ झाली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई ते कोलंबो विमान प्रवासाच्या तिकीटाच्या दरात 10 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता 60 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. (Photo Credit : Getty/PTI)

2 / 5
तसेच हा सामना होणार असल्याने तब्बल 1500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान टळल्याचं समोर आलंय. इंडियन एक्सप्रेसने आयसीसीच्या सू्त्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने जवळपास 174 मिलियन डॉलर अर्थात 1500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान टळलं आहे. (Photo Credit : Getty/PTI)

तसेच हा सामना होणार असल्याने तब्बल 1500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान टळल्याचं समोर आलंय. इंडियन एक्सप्रेसने आयसीसीच्या सू्त्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने जवळपास 174 मिलियन डॉलर अर्थात 1500 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान टळलं आहे. (Photo Credit : Getty/PTI)

3 / 5
पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. आम्ही टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता उर्वरित स्पर्धेत खेळणार असल्याचं पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.(Photo Credit : Getty/PTI)

पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ टीम इंडिया विरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. आम्ही टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता उर्वरित स्पर्धेत खेळणार असल्याचं पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.(Photo Credit : Getty/PTI)

4 / 5
केकेआरने आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमातून बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान याला वगळल्यांनतर या प्रकरणाला तोंड फुटलं होतं. बांगलादेशने सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, बीसीबीकडून अशी मागणी आयसीसीकडे करण्यात आली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली. त्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशच्या समर्थनासाठी पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय तेव्हा पाकिस्तानने घेतला होता. मात्र काहीच दिवसात पाकिस्तानची अक्कल ठिकाण्यावर आली. (Photo Credit : Getty/PTI)

केकेआरने आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमातून बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान याला वगळल्यांनतर या प्रकरणाला तोंड फुटलं होतं. बांगलादेशने सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, बीसीबीकडून अशी मागणी आयसीसीकडे करण्यात आली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली. त्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशच्या समर्थनासाठी पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध न खेळण्याचा निर्णय तेव्हा पाकिस्तानने घेतला होता. मात्र काहीच दिवसात पाकिस्तानची अक्कल ठिकाण्यावर आली. (Photo Credit : Getty/PTI)

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....