भारताने अनेक अडचणीवर मात करत 100 कोटी लोकांचं लसीकरण केलं. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. त्याचंच हे फलित आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशाने 100 कोटी व्हॅक्सिनेशनचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधत व्हॅक्सिनेशची निर्मिती, वितरण, लसीकरणासह नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर भाष्य केलं. त्यांनी भाषणाची सुरुवातच एका वेद वाक्याने केली. त्यानंतर त्यांनी व्हॅक्सिनेशन प्रोग्रामवर डिटेल्स माहिती दिली. .