शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकरणाशी संबंधित मुंबईत दोन ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. राऊतांच्या अटकेवरून राज्यसभेत गोंधळ पहायला मिळाला. तपास यंत्रणेच्या गैरवापरावर चर्चेची मागणी केली गेली. “सर्वांनाच मंत्रीपदाची ऑफर दिल्याने विस्तार रखडला. कॅबिनेट बैठकीच्या 45 खुर्च्यांच्या सभागृहात फक्त दोघंच बसत आहे”, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी अजून तिसरा माणूस सापडला नाही, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. यासह इतरही महत्त्वाच्या हेडलाईन्स पाहुयात..