“गेल्या एक वर्षापासून महाबळेश्वत तालुक्यात मीटर उपलब्ध नाही. माझ्या घराला सहा महिन्यांपासून मीटर नाही. सरसकट वीज बिलं दिली जातात. डोंगराळ भागात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना कर्मचाऱ्यांचा तिथे तुटवडा आहे. त्यामुळे माझे दोन प्रश्न आहेत. मीटर ताबडतोब उपलब्ध करून देणार का आणि कर्मचाऱ्यांचा तुटवटा भरून काढणार का”, असा प्रश्न शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केला. यावर मीटर ताबडतोब उपलब्ध करून देण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले.