Chandrakant Patil | एखाद्या वाक्यावरून केंद्रीय मंत्र्याला अटक होत नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | एखाद्या वाक्यावरून केंद्रीय मंत्र्याला अटक होत नाही : चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 9:44 AM

“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला.

“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला.

“प्रत्येकाची स्टाईल असते, त्यात व्यक्तिगत असूया नसते. पण अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. मी त्याचं समर्थन करत नाही. कोकणात शिव्यांशिवाय बोलणंच पूर्ण होत नाही. ते असूयेपोटी नसतं, रागापोटी नसतं” असा दावा पाटलांनी केला.

“राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे’ ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. राणे तसे म्हणालेच नाहीत. ‘मी असतो तर’ असं ते म्हणाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.