पोलिसांच्या घरांबाबत महत्त्वपूर्ण बैठक

| Updated on: Jul 27, 2022 | 5:58 PM

"गणपती आणि दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांवर क्षुल्लक कारणांमुळे काही गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे"

Follow us on

मुंबई: “गणपती आणि दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांवर क्षुल्लक कारणांमुळे काही गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस वसाहतीच्या बाबतीत एक महत्त्वाची बैठक झाली. मुंबईत 5० हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत, राज्यात पोलिसांना पावणेदोन लाख घरांची आवश्यकता आहे. त्या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली आहे. पोलिसांच्या घरांसाठी मास्टर प्लान तयार करण्याचा निर्णय झाला आहे. विविध योजनांमधून पोलिसांना घर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालाय” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.