मागील बरेच दिवस विविध पक्षांचे नेतेमंडळी पूर आलेल्या भागात जाऊन पाहणी करत आहेत. महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज सांगलीत जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत केला. यावेळी बोलताना ते म्हणाले,”दरवर्षी पूरग्रस्तांना मदत करुच, पण अशा प्रकारची परिस्थिती दरवर्षी ओढावेल हे मला तरी मान्य नाही.”