मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व (Monsoon) पासवानं हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांआधी राज्यातील अनेक भागात पावसानं जोरदार बॅटींग केल्यानं उन्हाच्या झळा सोसणाऱ्यांना काहीसा दिसालामिळाला. तर पावसाला सुरूवात होत असल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आलाय. दरम्यान, मुंबई आणि नवी मुंबई भागात काही ठिकाणी पाऊस (Rain) पडल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. नरिमन पॉईंटमध्ये (Nariman Point) ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून गार वारा सुटलाय.