उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रक्ततुलेवरून आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला आता खासदार नवनीत राणा यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. यावेळी खासदार राणा यांनी मिटकरी यांच्याकडं बोलण्यासाठी आता काहीच उरलेलं नाही, असाही घनाघात केला आहे. तसेच हे रक्त मेळघाटातील कुपोषीत आणि आदिवासींसाठी असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आझादी का अमृत महोत्सावातंर्गत शहीदांना अभिवादन करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर खासदार राणा यांनी मिटकरी यांना चिमटा काढताना, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित दादा स्वतः या जिल्ह्यामध्ये आहे. मात्र ते स्वतः काही बोलत नाहीत. तर या आजूबाजूच्या लोकांनी जरा कमी बोलले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.